• Tue. Jun 9th, 2026
    Kalyan News : वालधुनी उड्डाणपूल 20 दिवस बंद, कल्याण-उल्हासनगरमधून पर्यायी मार्ग कोणते? पालिका प्रशासनाची माहिती

    Waldhuni Bridge Kalyan : वालधुनी पूल 20 डिसेंबरपासून पुढील 20 दिवस बंद असणार आहे. पूल बंद असेल त्यावेळी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शाळांच्या सुट्ट्या असल्याने या पुलाचं हे काम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कल्याण : कल्याण पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या वालधुनी उड्डाणपुलाच्या डांबरीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज, 20 डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील 20 दिवस म्हणजेच 10 जानेवारी 2026 पर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली. शाळांना असणारी नाताळची सुट्टी लक्षात घेऊन दुरुस्तीचे नियोजन केल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

    कल्याण पूर्वेकडून पर्यायी मार्ग

    याकाळात कल्याण पूर्वेकडून स्व. आनंद दिघे पुलावरून कल्याण पश्चिमेकडे वालधुनी पुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांना सम्राट चौक (डॉ. आंबेडकर चौक) येथे ‘प्रवेश बंद’ केला आहे. ही वाहने सम्राट चौकात उजवे वळण घेवुन पुढे शांतीनगर उल्हासनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
    Maharashtra TimesKarjat – Panvel Railway : कर्जत-पनवेल लोकल लवकरच सुरू, 300 मीटर लांबीचा बोगदा पूर्ण; कुठे-कसा आहे मार्ग?

    उल्हासनगरमधून पर्यायी मार्ग

    उल्हासनगरहून वालधुनी पुलावरून कल्याण पश्चिमकडे येणाऱ्या सर्व वाहनांना सम्राट चौकात ‘प्रवेश बंद’ करून, डावीकडे वळून पुढे स्व. आनंद दिघे पुलावरून इच्छित स्थळी पाठवले जाईल.
    Maharashtra Timesसिद्धेश्वर एक्सप्रेसमधून साडे पाच कोटींचं सोनं गायब, एसी फर्स्ट क्लासमधून कल्याणदरम्यान घटना उघडकीस; नेमकं काय घडलं?

    कल्याण पश्चिमकडील पर्यायी मार्ग

    कल्याण पश्चिम वालधुनी पुलावरून सम्राट चौकामार्गे उल्हासनगर आणि स्व. आनंद दिघे पुलावरून कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात ‘प्रवेश बंद’ करून, सरळ पुढे, कर्णिक रोड, प्रेम ऑटो येथे उजवीकडे वळून शहाड पुलामार्गे पाठवले जाईल.
    Maharashtra TimesKalyan Ring Road : डोंबिवली-कल्याण रिंगरोड लवकरच सुरू, खाडी किनाऱ्यालगत संपूर्ण मार्ग; ठाण्यापर्यंतचं अंतर कमी होणार

    कल्याणमध्ये रिंगरोड, मेट्रोचं काम प्रगतीपथावर

    दरम्यान, कल्याणमध्ये रिंगरोड तयार केला जात आहे. दुर्गाडी ते मोठागाव माणकोली या सर्वात मोठ्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण करण्याचं ‘एमएमआरडीए’ कडून सांगण्यात आलं आहे. या रिंगरोडमुळे कल्याण ते मोठागाव अंतर 10 मिनिटांत गाठता येणार आहे. या रिंगरोडमुळे कल्याण आणि ठाण्यातील अंतरही कमी होण्यास मदत होईल.

    मराठी तरुणीसोबत गंभीर प्रकार; पोलिसांनी आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं

    त्याशिवाय ठाणे ते कल्याण मेट्रोदेखील धावणार आहे. या मार्गिकेचा कल्याण-ठाणेवरुन मार्ग ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन ते कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समिती असा आहे. कल्याण-ठाणे या उन्नत मार्गिकेसाठी जवळपास 292 बांधकामं पाडली जाणार आहेत. या सुविधांमुळे कल्याणकरांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा