Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयानं त्यांच्या अटकेचं फर्मान काढलं होतं आणि कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली होती.
शासकीय कोट्यात येणाऱ्या सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांचा दंड ठोठावला. ही शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली. मंत्री कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले. अटकेची शक्यता निर्माण झालेली असताना मंत्री कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अटकेच्या स्थगितीसाठी धाव घेण्यात आली. त्यासाठी त्यांच्या प्रकृतीचा दाखला देण्यात आला. पण अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे कोकाटे आणखी गोत्यात आले. अखेर आता त्यांच्याकडे असलेली खाती काढून घेण्यात आलेली आहेत. ते बिनखात्याचे मंत्री आहेत. उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा न दिल्यास त्यांचं मंत्रीपदही काढून घेण्यात येईल.
माणिकराव कोकाटे गोत्यात, मुंडे दिल्लीत; थेट अमित शहांची भेट; धनुभाऊंचं टायमिंग चर्चेत
नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या बैठकीत कोकाटे यांच्याबद्दल चर्चा झाली. कोकाटे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांकडे महत्त्वाची शिफारस केली. कोकाटे यांच्याकडे असलेला मंत्रिपदाचा कार्यभार काढण्याची विनंती फडणवीसांकडून करण्यात आली. ती राज्यपालांनी मान्य केली. कोकाटे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे. या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलेली आहे.
Sharad Pawar: महायुती अन् ठाकरे बंधूंची लढाई; शरद पवार आश्चर्यजनक निर्णय घेण्याच्या तयारीत, घडामोडींना वेग
कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी, ‘ते’ प्रकरण नेमकं काय?
१९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातली १० टक्के राखीव सदनिकांचं वाटप कमी दरात करण्यासाठी बोगस कागदपत्रं तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवर आहे. कोकाटे बंधू (माणिकराव आणि त्यांचे बंधू) यांनी अल्प उत्पन्न गटात येत असल्याचं आणि शहरात घर नसल्याचं दाखवण्यात आलं. या बोगस कागदपत्रांच्या आधारे नाशिकच्या उच्चभ्रू बागात दोन सदनिका मिळवल्या. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरुन १९९७ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात एकूण चार आरोपी आहे. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू आणि अन्य दोघांचा यात समावेश आहे.
