Maharashtra Cold Wave Alert: थंड आणि आल्हाददायक वातावरणासाठी नाशिक परिचित असून, गारठ्याने नाशिक, जळगावकरांना हुडहुडी भरली आहे.
यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्वांत कमी तापमान शुक्रवारी नोंदविण्यात आले. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू कृषी संशोधन केंद्रात यंदा प्रथमच ५.७ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. गुरुवारी रात्रीपासूनच वातावरणातील गारठा वाढल्याची प्रचिती येत होती.
शहरात गुरुवारी किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस होते. ते २४ तासांमध्ये ७.८ अंशांपर्यंत खाली आले. अहिल्यानगरमध्ये ७.३, जळगावात ६.९, मालेगावात ८.४, नंदुरबारमध्ये १४.१, छत्रपती संभाजीनगरमध्ये १०.६, तर महाबळेश्वरमध्ये १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
Maharashtra Politics: महायुतीचं अखेर ठरलं! सर्व महापालिका निवडणुका एकत्रच लढणार, रवींद्र चव्हाणांची घोषणा
रब्बीला पोषक, द्राक्षबागांना त्रासदायक
ही थंडी रब्बी पिकांना पोषक ठरणार असली तरी द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा, त्याचप्रमाणे तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. लवकर छाटणी केलेल्या द्राक्षबागेतील द्राक्षमणी तडकण्याचा धोका वाढला आहे.
पुण्याचा पारा ७.९ अंशावर
शहरात थंडीने आपले बस्तान बसवले असून, गुरुवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. गुरुवारी शहरात किमान ७.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. पहाटे कडाक्याची थंडी होतीच; शिवाय दिवसाही हवेत गारवा जाणवला. पुढील काही दिवस किमान तापमान दहा अंशाच्या खाली राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
Nashik Bribe Case: मोठी कारवाई! लाच घेताना सिन्नरचा नायब तहसीलदार ACBच्या ताब्यात, आकडा ऐकून महसूल विभागही हादरलं
मुंबई गारठली; पारा १५ अंशांखाली
राज्यभरात किमान तापमानाचा पारा १५ अंशांखाली गेल्यानंतरही थंडीच्या प्रतीक्षेत राहिलेल्या मुंबईकरांना शुक्रवारी पहाटे मात्र हुडहुडीचा अनुभव मिळाला. सांताक्रूझ येथे शुक्रवारी १४.९ अंश सेल्सिअश किमान तापमान नोंद झाली. शनिवारीही मुंबईचे किमान तापमान १५ अंशांच्या आसपास असेल असा अंदाज आहे.
