Pune News : पुणे न्यायालयाने ‘वेल्थ प्लॅनेट कंपनी’च्या तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रकरण काय ते जाणून घ्या.
कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित संजय कुलकर्णी (३९), कंपनीची टीम लीडर प्रज्ञा कुलकर्णी (४७, दोघेरा. नारायण पेठ, मूळ रा. धुळे) आणि मुख्य कामकाज अधिकारी श्वेता श्रीधर नातू (३४, रा. सावंतवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पाषाण येथे राहणाऱ्या गृहिणीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत घडली. आरोपी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका उच्चभ्रू व्यावसायिक इमारतीत कंपनी चालवायचे. या कंपनीतर्फे पंचतारांकित हॉटेलमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अभिजित कुलकर्णीने सांगितले, की त्यांच्या कंपनीतर्फे हिंदी चित्रपटांना वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय गुंतवणूक भारतात आणली जात असून, परकीय रोखे बाजारात गुंतवणूक केली जात आहे. कंपनीत गुंतवणूक केल्यास नफ्यातील साठ टक्के वाटा गुंतवणूकदारांना मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. तक्रारदारांनी गुंतवणूक स्वरूपात एकूण ४८ लाख ९१ हजार ८५० रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा केले.
कोर्टात फरार घोषित! Nilesh Ghaywal याच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता
आरोपींनी ही रक्कम ‘मिलिनिअर्स क्लब करन्सी बास्केट’ मध्ये आठ महिन्यांसाठी गुंतवली. मात्र, त्याचे गुंतवणूक प्रमाणपत्र वारंवार मागणी करूनही आरोपींनी दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेऊन गुंतवणुकीची मुद्दल परत मागितली. आरोपींनी तक्रारदारांना वेगवेगळ्या रकमेचे धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. अखेर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. सरकारी वकील कुंडलिक चौरे यांनी चार साक्षीदार तपासले. आरोपींनी तक्रारदारांना एक लाख ६२ हजार रुपये परत केले; तर उर्वरित ४७लाख २९ हजार ८५० रुपये तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयात जमा केले. मात्र, आरोपींनी ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.
Pune Gang war : बंडू आंदेकरच्या कुटुंबातील दोन जणांना राष्ट्रवादी निवडणुकीचं तिकीट देणार? शहराध्यक्षांचं सूचक वक्तव्य
नफ्यातील साठ टक्के वाट्याचे आमिष
‘हिंदी चित्रपटांना वित्तपुरवठा करण्यासाठी आपली कंपनी परकीय गुंतवणूक भारतात आणत आहे. परकीय रोखे बाजारात गुंतवणूक केली जात आहे,’ असे आरोपींनी सांगून गुंतवणूक करून घेतली. कंपनीत गुंतवणूक केल्यास नफ्यातील साठ टक्के वाटा गुंतवणूकदारांना मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले.
