Maharashtra Lokayukta Amendment Bill 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभा आणि विधान परिषदेत महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक सादर केले.
‘डिसेंबर २०२२च्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर हे विधेयक पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रपती भवनाने विधेयकात काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सुधारणा विधेयक सादर करीत आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले. ‘हे विधेयक मंजूर केल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवण्याची गरज नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती अभेद्य, एकत्र! महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढणार, बावनकुळे यांची घोषणा
फडणवीस यांनी या वेळी विधेयकात करण्यात आलेल्या सुधारणांची माहिती दिली. ‘जुना महाराष्ट्र लोकायुक्त कायदा संपेल, तेव्हा जुन्या लोकायुक्तांचा पदावधीही संपणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रथम नव्या लोकआयुक्त निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकायुक्त ही संस्था अस्तित्वात येईल. आधीच्या कायद्यात केंद्राच्या आयपीसी, सीआरपीएसी अशा जुन्या कायद्यांचा उल्लेख होता. हा उलेख काढून आता भारतीय दंड संहिता , फौजदारी प्रक्रिया संहिता आणि पुरावा कायदा या तीन कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे,’ असे फडणवीस यांनी नमूद केले.
सर्वात मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, एकनाथ शिंदेंची महत्त्वाची माहिती
केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या संस्थांवरील अधिकारी लोकायुक्तांच्या कक्षेत येणार की नाही, हा प्रश्न होता, परंतु अशा संस्थांवर अधिकारी निवडण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याने त्यांचा समावेश लोकआयुक्त कायद्यात करण्यात आला,’ असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महारेराचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांच्या खुलाशानंतर दोन्ही सभागृहांत चर्चा न होता हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.
Ravi Rana : ‘बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या’, आमदार रवी राणांची अजब गजब मागणी; म्हणाले मी स्वत:..
हजारे यांनी दिला उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर : महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यापूर्वी ‘लोकायुक्त कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी,’ या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. राळेगणसिद्धी येथे ३० जानेवारी २०२६पासून उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले. हजारे यांनी केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकआयुक्त कायदा व्हावा, यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
