• Sat. Jun 13th, 2026
    Nashik News : सिन्नर, इगतपुरीत सर्वाधिक एकल महिला; कारण काय? वाढत्या संख्येच्या कारणांचा जिल्हा परिषदेकडून शोध सुरू

    Nashik Igatpuri News : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक एकल महिलांची नोंद झाली आहे. सिन्नर आणि इगतपुरीमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. कोरोनानंतर विधवा महिलांची संख्या वाढली असल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील एकल महिलांच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणात तब्बल ९४ हजार ९८५ एकल महिलांची नोंद झाली आहे. यामध्ये सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक एकल महिला आढळल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल निफाड आणि येवला तालुक्यांचा क्रमांक लागतो. या तालुक्यांमध्ये एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यामागील कारणांचा शोध जिल्हा परिषदेकडून घेतला जात आहे.

    सर्वेक्षणात विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि प्रौढ कुमारिका अशा विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. नोंद झालेल्या महिलांपैकी ५५ वर्षांवरील एकल महिलांची संख्या लक्षणीय असून, ती ५८ हजार ६९४ इतकी आहे, तर ५५ वर्षांखालील महिलांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. विशेष म्हणजे, सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमध्ये नऊ हजारहून अधिक एकल महिलांची नोंद झाली आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढला, IMD चा यलो अलर्ट; पुढील काही दिवस कसं असेल हवामान?
    निफाड आणि येवला तालुक्यांमध्ये सुमारे ८,५०० महिलांची नोंद झाली आहे. या तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रे, नोकरीच्या संधी आणि शहरांचे समीपत्व यामुळे महिलांचे स्थलांतर अधिक प्रमाणात होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एकल महिलांची संख्या या भागात जास्त असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. पुढील काळात इतर सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांचाही सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. दुसरीकडे दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत सर्वात कमी एकल महिला असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
    Maharashtra Timesसिद्धेश्वर एक्सप्रेसमधून साडे पाच कोटींचं सोनं गायब, एसी फर्स्ट क्लासमधून कल्याणदरम्यान घटना उघडकीस; नेमकं काय घडलं?
    करोनानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या ‘आधारवडा’स गमावले असून, त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात विधवा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात ८९ हजार ३७४ विधवा महिलांची नोंद करण्यात आली आहे. पुनर्वसन कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकल महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतले जाईल. त्यासाठी महिलांना ग्रामपंचायतींकडे बोलावून जन्मदाखले, अधिवास, ओळखपत्रे, तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे तयार करून देण्यासह पात्र महिलांना निराधार पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

    सर्वेक्षणात इगतपुरी आणि तालुक्यात सर्वाधिक एकल महिला असल्याचे आढळले आहे. शहराजवळ असल्यामुळे महिलांचे या तालुक्यांत स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर सामाजिक व आर्थिक कारणांचाही शोध घेतला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, ओमकार पवार यांनी दिली.

    पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेप्रकरणी शिंदेंचे आमदार आक्रमक; अमोल खताळ यांची विधानभवनात निदर्शने

    जिल्ह्यात तब्बल ८९ हजार विधवा

    करोनानंतर अनेक कुटुंबांनी आपल्या ‘आधारवडा’स गमावले असून, त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात विधवा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यात ८९ हजार ३७४ विधवा महिलांची नोंद करण्यात आली आहे. पुनर्वसन कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकल महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतले जाईल. त्यासाठी महिलांना ग्रामपंचायतींकडे बोलावून जन्मदाखले, अधिवास, ओळखपत्रे, तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे तयार करून देण्यासह पात्र महिलांना निराधार पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा