Vidarbha Rain Update: ‘एनडीआरएफ’ व ‘एसडीआरएफ’ची पथके संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्याची संपर्क यंत्रणा विस्कळित झाली आहे. सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला असून, पूराचा धोका लक्षात घेऊन सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे . गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले.
Rain News: मराठवाड्याला पावसाने झोडपलं, पुढील दोन दिवस ३ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार, हवामान खात्याचा इशारा
पुरामुळे आलापल्लीहून दुरुस्तीसाठी निघालेल्या ‘महावितरण’च्या पथकाला मार्गात अडथळे आल्याने बिघाड दूर करता आला नाही. त्यामुळे २४ तास उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकलेला नसून, नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही अंधारात रात्र काढावी लागत आहे.
मेळघाटात परिस्थिती गंभीर
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले असून, मेळघाटातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर बनली आहे . सिपना नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे धारणी तालुक्यातील सुमारे २० गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. शहरातील इर्विन चौकात मोठे झाड कोसळून एक जण गंभीर जखमी झाला
Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
यवतमाळ, चंद्रपूरला फटका
– गुरुवारी वणी तालुक्यातील शिंदोळा, कायर, रासा, झरी जामणी तालुक्यातील झरी, खडकडो, मुकुटबन येथे अतिवृष्टी
– उमरखेड तालुक्यातील उमरखेड-किनवट रस्ता पावसामुळे खचल्याने वाहतूक बंद
– राळेगाव तालुक्यातील वडकी गावाजवळील पिंपळापूर मार्गावरील नाल्याला पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प
– केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण १०० टक्के भरल्याने खुनी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
