• Mon. Mar 16th, 2026
    ‘गोवा अग्नितांडवा’च्या घटनेवर ठाण्यात राजकारणाचा ‘भडका’, मनसे आणि भाजप ॲक्शन मोडवर

    गोव्यात झालेल्या आगीच्या दु्र्घटनेनंतर महाराष्ट्रातील ठाणे शहरात राजकारणाचा भडका उडाला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि भाजचे नारायण पवार हे नेते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : उत्तर गोव्यात गर्दीने भरलेल्या नाइटक्लबला शनिवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. डान्स फ्लोअरजवळ फोडलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे प्राथमिकरित्या केलेल्या चौकशीत समोर आले. ठाण्यातही विविध मॉल, वाणिज्य गृहसंकुल, मानपाडा येथील कोठारी कंपाउंड, हिरानंदानी इस्टेट, मेडोज, वागळे इस्टेट परिसरातील अवैद्य लाउंज आणि हुक्का पार्लरमध्ये तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, डान्सबार याठिकाणी अग्निशमन दलाची कोणतीच परवानगी न घेता पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरु असतो. या आस्थापनांवर ठाण्यात कारवाईची मागणी मनसे आणि भाजपने पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

    उत्तर गोव्यात डान्स फ्लोअरवर नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आग लागल्याने आगीचा भडका उडाल्यानंतर लोक सैरावैरा पळू लागले. अनेक जण तळमजल्यावर आणि स्वयंपाकघरात अडकले होते. या ठिकाणी एका तात्पुरत्या बांधकामाने सहज पेट घेतल्याने आग पसरत गेली आणि काही वेळातच संपूर्ण क्लब आगीत जळून खाक झाला.

    “ठाण्यात महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलीस प्रशासनातील अधिकार्‍यांच्या संगनमतपूर्वक हेतूमुळे अशा आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. तसेच या परिसरात अवैधरित्या होणार्‍या तात्पुरत्या बांधकामाने गोवा अग्निकल्लोळ दुर्घटनेची पुनरावृत्ती निश्चितच होऊ शकते. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक आहे”, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्त राव यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
    Maharashtra Times‘Ravindra Chavan माझ्या मोठ्या भावाप्रमाणे’, आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य, दोघांची दिलजमाई
    ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, हॉटेल, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावे. तसेच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी आयुक्त राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
    Maharashtra TimesRahul Narwekar : विरोधकांची इच्छा अपूर्णच राहणार? विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

    नववर्ष स्वागत पार्ट्यांवर सावट, येत्या काळात नववर्ष

    “स्वागतादरम्यान होणाऱ्या पार्ट्यामध्ये असे अग्नितांडव घडण्याची शक्यता आहे. सर्तकता बाळगत तात्काळ या आस्थापनांवर कारवाई करावी. अन्यथा, मनसे स्टाईलने याठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल”, असा इशारा मनसेच्या जाधव यांनी दिला आहे. तर ठाणे शहरातही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी शहरात हॉटेलला लागलेल्या आगीत काही ग्राहकांचा मृत्यू झाला होता. तर कापूरबावडी येथील वाणिज्य इमारत आगीत खाक झाली होती. वाढत्या अतिक्रमणांमुळे ठाणे शहरातील काही भागात अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकत नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप भाजपच्या पवार यांनी केला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा