Jamner Leopard Attack: बिबट्याचे नाव ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र जळगावच्या एका तरुणाने थेट बिबट्याशी झुंज देत त्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची एक घटना समोर आली आहे. या धाडसी घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
मंत्री गिरीश महाजनांनी घेतली दखल
नेहमीच आपण प्रसिद्धी माध्यमातून बिबट्याच्या आणि वाघाच्या बातम्या वाचत असतो, बघत असतो. बिबट्यांमुळे, वाघामुळे अनेक चिमुकल्यांसह नागरिकांचा जनावरांचा जीव देखील गेला आहे, मात्र यामुळे ग्रामीण भागात बिबट्याची चांगली दहशत निर्माण झाली आहे. आजही अशी स्थिती कायम असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका तरुणाने वन विभागाला चक्क जिवंत बिबट्या पकडून दिला आहे. सध्या या तरुणाची संपूर्ण पंचकोशीमध्ये जोरदार चर्चा सुरू असून मंत्री गिरीश महाजन यांनीही या तरुणाची दखल घेतली आहे.
झुंज देताना मुकेश जखमी
जळगावच्या जामनेर तालुक्यात शहापूर गावात तरुणाने हल्ला करणाऱ्या बिबट्यासोबत झुंज देत त्याला जिवंत पकडण्याची थरारक घटना समोर आली आहे. मुकेश नाना डोंगरे असे धाडसी तरुणाचे नाव असून तो शहापूर येथील रहिवासी आहे. बिबट्यासोबत दोन हात करताना तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून तरुणाचे धाडसाबद्दल आणि हिमतीचे कौतुक केले आहे, तरुणाच्या दाखवलेल्या धाडसाची आणि बिबट्यासोबतच्या थरारक झुंज दिल्याची जळगावच्या जामनेर तालुक्यात सह जिल्ह्यात एकच चर्चा रंगू लागली आहे.
वनकर्मचारी येईपर्यंत पकडून ठेवलं
शेतात बिबट्या असल्याची माहिती त्या तरुणाला मिळाली शहापूर- टाकरखेडा रोडवरील शेतात बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर याच दरम्यान बिबट्याने तरुणावर हल्ला केला. यात तरुणाने बिबट्यासोबत झुंज दिली. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत बिबट्याला पकडून ठेवलं व विभागाचे कर्मचारी आल्यानंतर तरुण आणि बिबट्याला त्यांच्या स्वाधीन केलं. या बिबट्याचे चारही पाय बांधून वनविभागाचे अधिकारी त्याला पिकप ट्रक मधून शेतातून घेऊन गेले.
एप्रिल महिन्यामध्ये नुकताच मुक्ताईनगर मधील बसस्थानक व शासकीय विश्रामगृहात परिसरात बिबट्या शिरला होता. तीन तासाच्या थरारानंतर वन विभागाने बंद केलं. यावेळेस आमदार चंद्रकांत पाटील देखील घटनास्थळी होते. अनेक अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वन विभागाने जुलबंद केले होते मात्र आज अशी एक घटना घडली असून या घटनेची पूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
