पुण्याहून रत्नागिरीला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनीबस हर्णे बायपासवर उलटली. या भीषण अपघातात १० पर्यटक जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातात एकूण १० पर्यटक जखमी झाले. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या, तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींमध्ये क्षितीज अशोक गुगणे (३५), आरोही पराग गायकवाड (४), पराग पर्शुराम गायकवाड (४०), नेहा पराग गायकवाड (३५), हितेश रमेश चौधरी (४०), ओजस अक्षय कुलकर्णी (५१), सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे (३९), प्राजक्ता महेश वाघमारे (३६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत.
Amaravati News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेकडून मुंबईसाठी विशेष गाड्यांची घोषणा
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाल केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर, अधिक उपचारांसाठी त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे हर्णे बायपासवरील पर्यटनस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
