Nana patole: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून काँग्रेसने सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील अव्यवस्थेसाठी निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे…
नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की निवडणूक आयोगाची अशी प्रक्रिया पहिल्यांदाच पाहतो आहे. मुख्यमंत्रीच हे मान्य करत असतील, तर राज्यघटनेच्या कलम 243 नुसार निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणला पाहिजे. आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. आम्हालाही ही प्रक्रिया पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. जर सरकारने महाभियोग आणण्याची इच्छाच दाखवली नाही तर निवडणूक आयोगाच्या मागे सरकारच आहे, असा संशय जनतेमध्ये निर्माण होणे साहजिक ठरेल. लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करत आहे, असा तीव्र आरोप त्यांनी केला. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असून विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
Ratnagiri News: काळ आला होता पण वेळ नाही! मिनीबसचा विचित्र अपघात; रिव्हर्स घेताना पलटी झाली, 10 जण…
निवडणुकीतील गैरप्रकारांवरूनही त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात पैसे पकडले गेल्याचा दावा करत ते म्हणाले, निलेश राणे यांनी भाजपचे पैसे पकडून दिले, भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिले. बूथवर खुलेआम पैसे वाटण्यात आले. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मतदान विकत घेण्याचा प्रकार कधीच झाला नव्हता. पण यंदा महाराष्ट्राची माती करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरही पटोले यांनी सरकारला जाब विचारला. देवेंद्र फडणवीस २४ तासांत ओबीसी आरक्षण परत देऊ म्हणाले होते, पण आजतागायत काहीही झाले नाही. घाई-गडबडीत निवडणुका जाहीर केल्या, आरक्षणाचा नीट अभ्यास केला नाही. त्यामुळे काही ठिकाणी ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपुढे गेले आणि आरक्षणाचा गोंधळ झाला. महाराष्ट्राचे वस्त्रहरण केले गेले, अशी टीका त्यांनी केली.
पुणेतील फुरसुंगी येथे झालेल्या राड्यानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सत्ता पक्षाचे आमदार गुंडगिरी करत असून सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. संतोष देशमुख प्रकरणासारखे अनेक प्रकार महाराष्ट्रात होत आहेत, असे त्यांनी म्हटले.
तसेच, निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी पुढे ढकलल्याने ईव्हीएम सुरक्षेवर गंभीर शंका निर्माण झाल्याचे पटोले म्हणाले. “उद्या निकाल झाले असते तर काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला असता. सरकार त्यांच्या ताब्यात असताना आता सर्व काही संशयास्पद आहे,” असा आरोप त्यांनी केला.
