Devendra Fadnavis: भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगरपंचायतींमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा झाल्या.
फडणवीस म्हणाले, छोट्या शहरांमध्ये निधी देऊन त्यांचा चेहरा बदलू शकतो. शहरांमध्ये संधी असल्यामुळे गावातील लोक शहराकडे जातात. पण, नियोजन नसल्यामुळे शहरांची अवस्था बिकट झाली. २०१४नंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा देशातल्या शहरांसाठी विविध योजना सुरू केल्या. त्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासासाठी दिले. शहरातील घरांचे पट्टे आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचा विकास करता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे फडणवीसांचं सरकार आहे, जास्त कराल तर कापून काढू; BJP आमदाराची विरोधकांना उघड धमकी
भंडारा, गोंदिया, चंद्रपूरपर्यंत गुंतवणूक विस्तारणार
लॉयड मेटल्सनंतर टाटा स्टील आणि जेएसडब्ल्यू प्रकल्पदेखील गडचिरोलीत आले आहेत. येत्या काळात ही गुंतवणूक केवळ गडचिरोलीपुरती मर्यादित राहणार नाही. ती भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरपर्यंत विस्तारेल. पवनी आणि साकोलीमध्ये विकासकामे केली जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भंडाऱ्यातील सभेत बोलताना त्यांनी विकासाचे चित्र मांडले.
व्यासपीठावर आमदार परिणय फुके, भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, माजी खासदार सुनील मेंढे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असा दावा करून विरोधकांनी चुकीची माहिती पसरवली. जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही. लाडक्या बहिनींना लखपती दीदींमध्ये रूपांतरित केले जाईल. गेल्या दीड वर्षांत ५० लाख बहिणींना लखपती दीदींमध्ये रूपांतरित केले आहे. लाडक्या बहिणींना मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे ते म्हणाले. सर्व अतिक्रमणे नियमित केली जातील. त्यांना मालकी पट्टे दिले जातील. बेघरांना नगर परिषदेमार्फत घरे दिली जातील. झुडपी जंगलात अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीचे पट्टे आणि घरे दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ayodhya paul राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सोडलं नाही…अयोध्या पौळ बेक्कार बोलल्या
गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार करणार
गडचिरोली जिल्ह्यात तीन लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. टाटानगरमुळे झारखंडचे चित्र बदलले. याहून मोठी गुंतवणूक येत असल्याने गडचिरोलीचे चित्र बदलणार आहेत. गडचिरोलीला दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनविणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तिन्ही नगर परिषदांमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी फडणवीस यांची गडचिरोलीत जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
