Bhadrawati nagar parishad election: भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना महिलांनी प्रचारादरम्यान जाब विचारला होता. पंधरा वर्षांतील कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महिलांनी धानोरकरांना धारेवर धरले होते. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
वेगवेगळ्या तीन राजकीय पक्षातील परिपक्व अनुभवाची गाठोली खांद्यावर असलेल्या अनिल धानोरकर यांनी भाजपचा दुपट्टा खांद्यावर टाकला.अनिल धानोरकर दिवंगत बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू. चंद्रपूरचा राजकारणात धानोरकर परिवाराचे मोठे नाव आहे.याच परिवारातील अनिल धानोरकर यांना महिलांनी हाकलून लावल्याचा विडिओ पुढे आला होता. चंद्रपूरच्या राजकारणात या विडिओने खळबळ उडाली होती. इकडून तिकडे उडी मारलेल्या अनिल धानोरकर हे विधानसभा निवडणीकीत वंचितचे उमेदवार होते. मतदारांनी त्यांना चांगलंच आपटलं. आता ते भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. पंधरा वर्षांपूर्वी जसा वार्ड होता, आता तसाच आहे. तुम्ही काय केलं, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषधेत दहा वर्ष नगराध्यक्ष तर पाच वर्ष उपाध्यक्ष होते. ज्याला मतदारांनी हाकलून लावले त्यांचा प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री आज भद्रावतीत पोहोचले होते. ज्यांना जनतेचा पाठिंबा नाही त्यांचा प्रचारासाठी मुख्यमंत्री आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा धुरळा उडाला आहे.
‘वाल्मीक कराडला फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार
नेमकं काय घडलं?
निवडणूकीचे वातावरण तापले आहे. उमेदवारांचा घरभेटी, वॉर्ड भेटी वाढल्यात. प्रचारासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर गवराळा प्रभागात गेले होते. ते गेले खरे मात्र येथे त्यांचा क्लास महिलांनी घेतला. मागील पंधरा वर्षात काय केलं? ते सांगा, अशी विचारांना केली. प्रश्नांचं घट्ट जाळं त्यांनी धानोरकरांवर फेकलं. यातून कशी बशी सुटका करून धानोरकर यांनी काढता पाय घेतला.
‘तुमच्या तोंडाला दारूचा वास’
यावेळी एकत्र आलेल्या महिलांनी धानोरकर यांना दारू दुकानावरूनही धारेवर धरले. दारूचे दुकान तुमचे. तुमच्या दुकानामुळे आमच्या मुलांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. आताही आम्हाला तुमच्या तोंडाला दारूचा वास येत आहे.
‘चाळीस वर्ष झालीत, स्थिती जैसे थी’
एका महिलेने जाब विचारताना म्हटलं, मी चाळीस वर्षापूर्वी लग्न करुन आले. तेव्हा ज्या समस्या होत्या, त्या आजही कायम आहेत. रस्ते नाही, नाल्या नाहीत. स्वच्छता नाही. पावसाळ्याच्या दिवसात कुणी येवून बघत नाही. या प्रश्नांची उत्तर धानोरकर देऊ शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूर जिल्ह्याशी फारच घट्ट नाते असून, त्यांचं प्राथमिक शिक्षण याच जिल्ह्यात झाले आहे. ते मुख्यमंत्री असले तरी वर्गमित्रांना विसरले नाहीत. आपला मुलगा म्हणून त्यांच्याकडे चंद्रपूरकर बघत असतात. मात्र ज्या व्यक्तीला येथील जनतेने हाकलून लावलं, त्यांच्याच प्रचारासाठी आज मुख्यमंत्री पोहोचल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
