कुंभमेळ्याचा पार्श्वभूमीवर नाशिकमधील जवळपास दोन हजार झाडं तोडण्यात येणार आहेत.तपोवनातील साधुग्राम येथील वृक्ष तोडीवरून नाशिककर आक्रमक झाले आहेत.तपोवन वाचवण्याच्या या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदेंनी पाठिंबा दर्शवला आहे. साधू आले गेले गेले तरी फरक पडत नाही, झाडे राहिली पाहिजेत, असे ते म्हणाले. झाडं आमचे आईबाप आहेत, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.