• Sat. Mar 7th, 2026
    ‘कमळाचं बटण दाबलेलं मुख्यमंत्र्यांना कळतं, लाडक्या बहिणींचे पैसे वाढतील’; भाजप आमदाराचं वक्तव्य चर्चेत

    Jalna News: राज्यात लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर-अंबडमध्ये जनतेला संबोधित करताना ‘कमळाचे बटन दाबले तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना: राज्यात ‘ लाडकी बहीण योजना ‘ प्रचंड लोकप्रिय ठरली असून, या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यात यश आले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले असून, महायुती सरकार असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघातील जनतेला संबोधित करताना म्हटले की, ‘कमळाचे बटन दाबले तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कमळाचे बटन दाबले तर मुख्यमंत्र्यांना कळते.’ या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

    आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही लाडकी बहीण योजना आम्ही सुरु केली आम्ही लाडक्या बहि्णींची काळजी घेतो असं सागितलं जात आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांनी नुकतचं या योजनेबद्दल एक विधान केलं आहे जे सध्या चांगलच चर्चेत आलं आहे.

    Maharashtra Times‘हा ध्वज संघर्षानंतर झालेल्या निर्मितीची कहाणी’; राम मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान मोदींचे भाषण, म्हणाले….

    भाजप महायुतीचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी यावेळी सांगितलं की ‘कमळाचे बटन दाबले तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कमळाचे बटन दाबले तर मुख्यमंत्र्यांना कळते असं, आमदार नारायण कुचे म्हणाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे.

    आमदार कुचे नेमंक काय म्हणाले?

    भाजपला मतदान करा असं आवाहन करताना नारायण कुचे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना, पीएम आवास योजना, नमो योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना बंद होणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला कमळाचं बटण दाबावं लागतं, तेव्हा मुख्यंमंत्र्यांना कळतं.

    मग ते लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे तीन हजार कसे करावे याचा विचार ते करतील, आम्हालाही विचारतील, आम्ही त्यांना सांगू की आम्हाला महिलांनी खूप मतदान केले आहे. तर आता योजनेचे पैसे वाढवून तीन हजार, अडीच हजार करा.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा