मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा एका कार्यक्रमात एकत्र आलेले बघायला मिळाले. पण या कार्यक्रमातही दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा आणि अबोला बघायला मिळाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही, असंच चित्र सध्या तरी दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावर महायुतीत नाराजीनाट्य रंगलं आहे. शिवसेना मंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यापैकी अनेकांना भाजपने पक्षप्रवेश देत त्यांची ताकद वाढवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी याच नाराजीतून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. केवळ एकनाथ शिंदे बैठकीत उपस्थित होते. तसेच मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी नाराजीवर तोडगा निघाल्याचं सांगितलं जात होतं.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर वादावर पडदा पडला असं वाटत असताना एकनाथ शिंदे लगेच तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली असावी, असं वाटत असली तरी त्यांची नाराजी दूर करण्यात अद्याप तरी भाजपला पुरेसं यश आलेलं दिसत नाही. विशेष म्हणजे बिहार सरकारच्या शपथविधी सोहळ्यात शिंदे-फडणवीस यांच्यात अबोला दिसला. हुतात्मा दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमातही दोन्ही नेत्यांची देहबोली देखील दोघांमध्ये ठिक आहे, असं दर्शवणारी नव्हती. ऐरव्ही दोन्ही नेते हसत-खेळत कार्यक्रमांमध्ये दिसायचे. पण या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक’, नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंचं डहाणूत मोठं वक्तव्य विशेष म्हणजे या सर्व नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुन्हा एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले बघायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशनने आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आलेले बघायला मिळाले. पण या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अबोला पुन्हा दिसला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर दिसले. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत संवाद करण्याचे टाळल्याचं बघायला मिळालं. भाजपच्या अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा, मुंबईत भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने दोन्ही नेत्यांची भाषणे झाली. पण भाषणानंतरही दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळलं आहे. तसेच संवाद साधणं देखील टाळलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी केली. पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद करणं टाळलं.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा