• Thu. Mar 12th, 2026
    जॉब सोडल्यानं बेरोजगारी अन् मानसिक तणावात, तरुणाचं राहत्या घरी टोकाचं पाऊल; आई-वडिलांचा आक्रोश

    Alibaug Youth Commits Suicide : राज्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच, अलिबागमधील माळी भेरसे येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    बेरोजगारीमुळे तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : अलिबाग तालुक्यातील माळी भेरसे येथील 24 वर्षीय भावेश प्रमोद पाटील याने घरात कोणी नसतानाच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. मृतक भावेश हा जिंदाल ड्रग्ज प्रा.लि.मी. एमआयडीसी तळोजा या कंपनीत काम करत होता. परंतु नुकतेच त्याने नोकरी सोडल्यामुळे तो बेरोजगारी आणि मानसिक तणावाखाली होता, असं प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

    मृतकाचे वडील प्रमोद रघुनाथ पाटील (वय 55) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात ही घटना नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत ग्यानोबा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात असं आढळलं की भावेशने घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. उपचारासाठी त्याला प्रा.आरोग्य केंद्र रेवदंडा येथे नेलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं.

    Maharashtra Timesनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच गुजरात पोलिसांकडून अटक, नंदुरबारच्या नवापूरमध्ये काय घडतंय?

    बेरोजगारी आणि मानसिक तणाव

    पोलिसांनी नोंदवलं की, भावेश बेरोजगार होऊन मानसिक तणावाखाली होता. त्याचं या टोकाच्या पावलाकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी, नोकरीमधून राजीनामा आणि घरातील एकटेपणा आहे. ही घटना स्थानिक समाजासाठी एक गंभीर इशारा ठरली आहे. तरुणांमध्ये मानसिक आरोग्यावर लक्ष न दिल्यास जीवघेणा परिणाम होऊ शकतात. पोलीस नोंदवही क्रमांक 41/2025, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चे कलम 194 अंतर्गत नोंदवण्यात आली आहे. तपास अजूनही सुरू असून, कुटुंबीयांसह इतर तपासासाठी आवश्यक कारवाई केली जात आहे.

    Maharashtra Timesनातेवाईकांच्या मुलीसोबत पोहायला उतरला, पाण्याचा अंदाज न आल्यानं दम लागला; सुट्टीवर आलेल्या हितचा दुर्दैवी अंत

    स्थानिक नागरिकांनी या घटनेतून मानसिक आरोग्य, बेरोजगारी आणि तरुणांवरील दबाव याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सामाजिक संघटनांनी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सल्लागार व मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचं सांगितलं. विशेषज्ञांचं मत आहे की, नोकरी गमावल्यामुळे किंवा मानसिक तणावामुळे तरुण जेव्हा निराश होतात, तेव्हा त्यांना त्वरित कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सहाय्य मिळणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत घरातील कुटुंबीय, मित्र आणि स्थानिक संघटना सक्रिय हस्तक्षेप करणे महत्त्वाचे ठरते. ही घटना अलिबागसारख्या शहरात मानसिक आरोग्याची जाणीव वाढवण्याचे तसेच बेरोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावावर लक्ष देण्याचं आव्हान ठरली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा