Malnutrition Cases In Maharashtra: ऑक्टोबरमध्ये गडचिरोलीत ४६ टक्के मुले तीव्र कुपोषित गटामध्ये मोडत होती, तर २५ टक्के मुलांचे वजन कमी होते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही हीच स्थिती होती.
मे महिन्यात तीव्र कुपोषित गटात ४४ टक्के, जून आणि जुलैमध्ये ४५ टक्के मुले होती. २५ टक्के मुलांचे वजन अत्यंत कमी असल्याचे आढळले. एकात्मिक बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारमध्ये परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे.
Mumbai Crime: नव्या घरावरुन मुंबईकर जोडप्याची वादावादी, नवरा संतापला, झोपेतच बायकोवर…
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या ६६ टक्के, तर कमी वजनाच्या मुलांची संख्या ४४ टक्के आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वाढ खुंटलेल्या मुलांचे प्रमाण ४९ ते ५१ टक्के या दरम्यान आहे, तर कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २६ टक्के इतके नोंदवण्यात आले. धुळे येथे या कालावधीमध्ये कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २१ टक्के असून ४३ टक्के मुलांची वाढ खुंटली असल्याचे दिसून आले आहे.
वजन कमी असणारी, कुपोषित गटातील मुले ही कोणत्याही प्रकारच्या संसर्गाला बळी पडून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना या श्रेणीतून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने सप्टेंबरमध्ये पोषण महिन्याच्या निमित्ताने आरोग्य आणि आहाराशी संबंधित उपक्रम राबवले. त्याचा लाभ आदिवासी आणि दुर्गम भागातील या बालकांना किती झाला, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा ब्लॉक, कोणत्या लोकल, एक्सप्रेसवर होणार परिणाम? जाणून घ्या
तीव्र कुपोषित गटातील मुले ही योग्य प्रकारचा आहार आणि वैद्यकीय निगराणीनंतर मध्यम कुपोषण गटात येतात. मात्र पावसाळा किंवा साथीचे आजार यांचा प्रादुर्भाव झाल्यास ती पुन्हा तीव्र कुपोषणाच्या गटामध्ये जातात. हे रोखण्याचे आव्हान आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश आशा सेविका, तसेच अंगणवाडीताईंना देण्यात आले आहेत. स्थानिक आहार, तसेच मिलेटचा समावेश कुपोषण असलेल्या भागामध्ये करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे, असे कुपोषणमुक्तीसाठी नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
Woman Cooking Maggi on Train : एकादशी आहे, १५ जणांचा चहा आणि मॅगी बनवतेय… महिलेचा ट्रेनमध्ये स्वयंपाक, नेटिझन्सच्या ‘वाफा’, मध्य रेल्वे ‘गॅसवर’
लोकसमूहानुसार प्रश्न वेगळे
नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, तसेच राज्यातील आदिवासी ग्रामीण भागामध्ये लोकसमूहानुसार प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करायला हवा. बाळाच्या जन्माच्या वेळी आईचे वजन किती होते, तिला अनुवांशिक आजार आहेत का, त्यावेळी कोणत्या साथीचा प्रादुर्भाव होता का, या प्रत्येक घटकाचा विचार करायला हवा. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कुपोषणाचे प्रमाण किती आहे, याचा तुलनात्मक अभ्यास करून प्रमाण कमी झाले, असा दावा करता येणार नाही. पोषण निकषानुसार लोकसंख्येत किमान दोन टक्के कुपोषण अपेक्षित असते, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
