मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.विकासाचं मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.कॉन्ट्रक्टरसाठी ठोस योजना आणणारं हा अर्थसंकल्प आहे असं ठाकरेंनी सांगितलं.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच नाही यावरही ठाकरेंनी टीका केली.एकनाथ शिंदे यांच्या गावात निसर्गोपचार केंद्राची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.मानसोपचार केंद्र म्हणत उद्धव ठाकरेंनी एका शब्दात उत्तर दिलं.