मुंबईसाठी करण्यात आलेल्या घोषणांची A टू Z माहिती
वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हबसाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे. मुंबई-अहमादाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरीमधील 3 स्थानकांचे काम 2027 अखेर पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मुल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, भोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरता आराखडा तयार करण्यात येईल.
अटल बिहार वाजपेयी शिवडी-नावाशेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येईल. या अंतर्गत करनाळा-चिरनेर, रायगड, पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड विकास केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे.
पालघर जिल्ह्याच्या वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टीक आणि विअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करण्यात येतील.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महापानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडेतत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकाम होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी जीआयएस आधारित मॅपिंगचा वापर करुन नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येणार आहे. सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरांतदेखील लागू करण्यात येईल.
केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत देशभरातील निवडक शहरांचा, निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे.
जलवाहतूक : १२५ कि.मी.चे जलमार्ग जाळे ३४० कि.मी.चे करणार, २१ जलमार्गावरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण, ११ नवीन जलमार्गावर २४ नवीन टर्मिनल्स, यासाठी ६६०० कोटी, मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करणार
वडाळा, मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार
अटलसेतूला जोडून २०० चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई घडवणार : कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करणार
वाढवण बंदर : चौथी मुंबई. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी
विकास केंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार
मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार
मुंबई महानगर प्रदेशात २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, १० लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही, यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो ११ २३,४८७ कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प, याचा पुढे धारावी, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस असा विकास
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ : २२,८६२ कोटी
तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो २ : ५५७५ कोटी
मुंबईतील भुयारी मार्ग : ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीनड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, खारघर ते तुर्भे, वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
मुंबई महानगरात गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे ६ आणि ९ कि.मी.चा भुयारी मार्ग
उन्नत मार्ग : शिवडी-वरळी, ऐरोली कटाई नका, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत, ठाणे
सागरी सेतू : मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू: ५८,७५४ कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू तसेच वर्सोवा-दहीसर-भाईंदर ही कामे वेगाने सुरु
किनारी मार्ग : बाळकुम ते गायमुख, उलवे किनारी मार्ग
कल्याण ते लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग तयार करणार
पनवेल-कर्जत उपनगरीय प्रकल्प ३ बी १४,९०७ कोटी, यातून बदलापूर-कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई, ६९ कि.मी.चा नवीन उपनगरीय कॉरिडॉर
मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, ३० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन ४०० जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार