BMC Election 2025: आता भाजपने घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेत भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार की डच्चू देणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून त्याला आक्षेप घेण्यात आला आहे. शेलार यांनी याबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आमची भूमिका ठाम आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व असले तरी आरोपांबाबत आम्ही तडजोड करू शकत नाही. महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी नसावी अशी आमची भूमिका आहे. त्याबद्दल आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना सांगितली आहे. नवाब मलिकांसंदर्भात आता न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युतीमध्ये चर्चा करून शकत नाही,’ असे शेलार यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis : आमदार-खासदार येताच उठून उभे राहा, फडणवीस सरकारचा अधिकाऱ्यांसाठी नवीन जीआर, फोनवरील संवादासाठीही महत्त्वाची सूचना
निर्णय वरिष्ठ पातळीवर
युती करायची की नाही हा निर्णय समन्वय समिती आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, त्याविषयी इतरांनी भाष्य करणे योग्य नाही. शेलार यांचे वक्तव्य त्यांची वैयक्तिक भूमिका असावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली आहे. आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हरकत घेतली. ‘निवडणूक लढविताना तिन्ही पक्षांत समन्वय राहावा यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातील चर्चा वरिष्ठ नेत्यांना कळवून अंतिम निर्णय त्या पातळीवर होतो. शेलार निवडणूक प्रभारी असले, तरी अमित साटम मुंबई अध्यक्ष आहेत. त्यांची याविषयी अद्याप काहीही भूमिका नाही,’ असे आनंद परांजपे यांनी सांगितले.
बाबा मला मारलं, तक्रार घेऊन कुणीतरी दिल्लीला गेलं; अमित शहांच्या भेटीवरुन ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
मलिक यांच्याकडील जबाबदारी योग्यच
भाजपने घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नवाब मलिक आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी देणे योग्यच आहे. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एकमेकांवर टीका न करता आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत. महायुतीमध्ये कुठलीही फूट नसून आमची एकी भक्कम आहे,’ असेही पटेल म्हणाले.
