• Sun. Jun 14th, 2026

    Jalna News : प्रार्थना झाल्यावर सगळे वर्गात, पण एक विद्यार्थिनी थेट तिसऱ्या मजल्यावर गेली अन्…जालना हादरलं

    Jalna News : प्रार्थना झाल्यावर सगळे वर्गात, पण एक विद्यार्थिनी थेट तिसऱ्या मजल्यावर गेली अन्…जालना हादरलं

    Jalna Crime : जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली. १३ वर्षीय आरोही बिडलानने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. वडिलांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या छेडछाडीला आणि शिक्षकांचे दुर्लक्ष आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जालना : जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय, शाळेच्या छतावरून आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीने आज सकाळी 8 शाळेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. आरोही दिपक बिडलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. सकाळीच आरोही नियमित शाळेत आली शाळेची प्रार्थना झाली, सर्व मुली आपापल्या वर्ग खोलीत गेल्या. मात्र आरोही प्रार्थनेनंतर तिसऱ्या मजल्यावर वर्ग खोलीकडे जाताना या खोलीबाहेरील गॅलरीमधून थेट खाली उडी मारली, सदर घटना ही शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

    सदर घटना ही वाऱ्यासारखी संपूर्ण जालना शहरात व परिसरात पसरली व पोलिसांना सुद्धा याची माहिती शाळेकडून देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. तर आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी शाळेतील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आणि शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय. काही दिवसांपूर्वी आरोहीला शाळेतीलच काही विद्यार्थी त्रास देत होते याची तक्रार आरोहिणी शिक्षकांकडे केली होती. मात्र शिक्षकांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केली आणि तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा आरोप आरोहीच्या वडिलांनी केला आहे.
    Maharashtra Times‘भाजी घेऊन येतो,’ म्हणत घरातून निघाला; भरबाजारात सुमोमधून चौघे उतरले अन्… जालनामध्ये थरकाप उडवणारी घटना
    दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत, कारण आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना आपुलकीची वागणूक देतो. त्यांची अडचणी आम्ही समजून घेतो असे म्हणत शाळेने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्याच नेमकं काय कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. तर आत्महत्या केलेल्या आरोहीचे वडील दीपक बिडलान यांनी टाहो फोडला. माझ्या मुलीची आत्महत्या ही शाळेच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तर शाळेचे शिक्षक सतीश देशमुख (मुख्याध्यापक) सी टी एम के गुजराती शाळा, यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तर याप्रकरणी योग्य ती चौकशी करून सत्य बाहेर आणून अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी महाराष्ट्र टाईम्ससोबत बोलताना म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा