• Sun. Jun 7th, 2026

    मिरा-भाईंदर ते दक्षिण मुंबई प्रवास सोपा! 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो 9चे काम अखेर पूर्ण; ‘या’ महिन्यात सुरू होणार सेवा

    मिरा-भाईंदर ते दक्षिण मुंबई प्रवास सोपा! 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो 9चे काम अखेर पूर्ण; ‘या’ महिन्यात सुरू होणार सेवा

    Dahisar-Kashimira Metro: मिरा-भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होईल. या मार्गामुळे थेट दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणे शक्य होईल.

    मिरा-भाईंदर: तब्बल चौदा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदरच्या रहिवाशांना अखेर मेट्रोची जोडणी मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी याबद्दल एक मोठा अपडेट दिली आहे. मिरा रोडमधील दहिसर ते काशिमिरा दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेचे काम पू्र्ण झाले असून, लवकरच ती प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

    वर्षाअखेरी पर्यंत सुरू होणार सेवा

    बुधवारी त्यांनी माहा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून, दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गेची चाचणी केली. यावेळी मेट्रोचे काम पूर्ण झाले असून डिसेंबरच्या अखेर पर्यंत सुरू होणार आहे. सरनाईक यांनी सांगितले की दहिसर–काशिमिरा मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांकडून (CMRS) प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. हे मंजुरीपत्र मिळाल्यानंतर राज्य सरकार उद्घाटनाची पुढील प्रक्रिया ठरवणार आहे. “डिसेंबरच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा आहे,” असे मंत्री म्हणाले.Maharashtra Timesदोन्ही विमानतळे आता फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर! मेट्रो 8च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार सोपा; कुठे असणार स्थानके?

    थेट दक्षिण मुंबईत प्रवास

    आपल्या जुन्या आश्‍वासनाची आठवण करून देत सरनाईक म्हणाले, “2009 मध्ये जेव्हा मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो, तेव्हा मी नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. त्या वेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या घोषणेची खिल्ली उडवली होती. पण 14 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.” “हा मार्ग सुरू झाल्यावर मिरा-भाईंदरचे रहिवासी थेट अंधेरीपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकतील,” असेही त्यांनी सांगितले. सरनाईक पुढे म्हणाले की प्रवासी तिथून मेट्रो लाईन 1 चा वापर करून विमानतळ मार्गे थेट कोलाबाही गाठू शकतील.

    Chitra Wagh: शिंदे-फडणवीसांचं नाव घेत चित्रा वाघ यांचा इशारा, भरसभेत सुनावलं, अंबरनाथमधील अण्णा कोण?

    ही मेट्रोसेवा सुरू झाल्यावर नवीन वर्षात मिरा-भायंदरच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय आणि दक्षिण मुंबईतील विधान भवनाशी सुलभ मेट्रो जोडणी मिळणार आहे. तसेच 2026 पर्यंत दहिसर-काशिमिरा मेट्रो लाईनचा विस्तार नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यंत केला जाणार आहे. त्यानंतर वसई-विरार मेट्रो मार्गिकेचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा