Dahisar-Kashimira Metro: मिरा-भाईंदरकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू होईल. या मार्गामुळे थेट दक्षिण मुंबईपर्यंत प्रवास करणे शक्य होईल.
वर्षाअखेरी पर्यंत सुरू होणार सेवा
बुधवारी त्यांनी माहा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसोबत मिळून, दहिसर ते काशिमिरा मेट्रो मार्गेची चाचणी केली. यावेळी मेट्रोचे काम पूर्ण झाले असून डिसेंबरच्या अखेर पर्यंत सुरू होणार आहे. सरनाईक यांनी सांगितले की दहिसर–काशिमिरा मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सेफ्टी आयुक्तांकडून (CMRS) प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. हे मंजुरीपत्र मिळाल्यानंतर राज्य सरकार उद्घाटनाची पुढील प्रक्रिया ठरवणार आहे. “डिसेंबरच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा आहे,” असे मंत्री म्हणाले.
दोन्ही विमानतळे आता फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर! मेट्रो 8च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार सोपा; कुठे असणार स्थानके?
थेट दक्षिण मुंबईत प्रवास
आपल्या जुन्या आश्वासनाची आठवण करून देत सरनाईक म्हणाले, “2009 मध्ये जेव्हा मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलो, तेव्हा मी नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. त्या वेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या घोषणेची खिल्ली उडवली होती. पण 14 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.” “हा मार्ग सुरू झाल्यावर मिरा-भाईंदरचे रहिवासी थेट अंधेरीपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकतील,” असेही त्यांनी सांगितले. सरनाईक पुढे म्हणाले की प्रवासी तिथून मेट्रो लाईन 1 चा वापर करून विमानतळ मार्गे थेट कोलाबाही गाठू शकतील.
Chitra Wagh: शिंदे-फडणवीसांचं नाव घेत चित्रा वाघ यांचा इशारा, भरसभेत सुनावलं, अंबरनाथमधील अण्णा कोण?
ही मेट्रोसेवा सुरू झाल्यावर नवीन वर्षात मिरा-भायंदरच्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय आणि दक्षिण मुंबईतील विधान भवनाशी सुलभ मेट्रो जोडणी मिळणार आहे. तसेच 2026 पर्यंत दहिसर-काशिमिरा मेट्रो लाईनचा विस्तार नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यंत केला जाणार आहे. त्यानंतर वसई-विरार मेट्रो मार्गिकेचेही काम पूर्ण करण्यात येणार आहे.

