Jalna Man Murder: जालना शहरात काल सायंकाळी भाजी खरेदी करणाऱ्या एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या झाली. चार हल्लेखोरांनी टाटा सुमो गाडीतून येऊन हा हल्ला केला. मृत तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र आरोपी पळून गेले.
तलवारीने केले सतत वार
हल्लेखोरांनी एवढ्या क्रूरपणे वार केले की मृत तरुणाचा चेहरा अक्षरशः छिन्न-विच्छिन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना क्षणार्धात वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. बातमी मिळताच पोलिसांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
मोठी बातमी! माळेगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, सुप्रिया सुळे संतापल्या
भाजीपाला खरेदी करताना…
जालना जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दिवसा ढवळ्या मुख्य बाजारपेठेत झालेल्या या हत्याकांडाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मृत तरुणाची ओळख बाबासाहेब सोमधाने (रहिवासी – अहंकार देऊळगाव, जिल्हा जालना) अशी झाली असून तो भाजीपाला खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
टाटा सुमोमधून केला हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, एका टाटा सुमो गाडीतून चार हल्लेखोर आले आणि त्यांनी अवघ्या दोन मिनिटांत तलवारीने वार करत सोमधाने यांची हत्या केली. विशेष म्हणजे, हत्येनंतर हल्लेखोरांनी आपली टाटा सुमो गाडी घटनास्थळीच सोडून पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून जुन्या वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सध्या, पोलिसांच्या या आधारे तपास सुरू आहे आणि आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे.
भोकरदन नगरपरिषद निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार; संतोष पाटील दानवेंनी प्लॅनिंग सांगितलं
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तातडीने घटनास्थळी हजर राहून पाहणी केली. बुधवारी (19 नोव्हेंबर) झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पोलीसांनी अनेक पथके रवाना केली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास सुरू आहे.

