• Wed. Jun 10th, 2026
    Kandivali Firing : कारमध्ये बसलेले असताना अचानक हल्ला, तरुण व्यावसायिकावर गोळीबार, दोन-तीन राऊंड फायर; मुंबई हादरली

    Mumbai Kandivali firing Builder Dilima Bhai Charkop Shot Firing : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच, मुंबईतल्या कांदिवली भागात एका तरुण व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे.

    मुंबई कांदिवली गोळीबार
    मुंबई : मुंबईसह पुणे, ठाणे या शहरात बिल्डर्सची संख्या वाढत असून बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल गुन्हेगारीला प्रवृत्त करताना दिसून येते. त्यातून, धमक्या, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताकडून फ्रेंडी दिलीमा भाईवर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले असून गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला आहे.

    कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून फ्रेंडी दिलीमा भाई या व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आला. फ्रेंडीभाई हा तरुण बांधकाम व्यावसायिक आहे, ते कारमध्ये बसले असताना दोघांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी, अज्ञातांनी 2 ते 3 राउंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    Maharashtra Timesकाल बहिष्कारअस्त्र, आज दिल्लीला रवाना; शिंदे तडकाफडकी निघाले, उद्यासाठी विशेष प्लान ठरला

    गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून वेगवेगळ्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचे शोध घेत आहेत. तर, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, मुंबई शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात, लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोघ घेतला जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा