• Sun. Mar 8th, 2026
    Ahilyanagar News : कोपरगावच्या वेशीवर घोंघावणारं ‘मृत्यूचं सावट’ अखेर दूर, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याचा खात्मा

    Kopargaon Leopard Killed : अहिल्यानगरमधील कोपरगावमधील त्या बिबट्याला अखेर ठार करण्यात आलं आहे. या बिबट्याने परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याला आता ठार केलं आहे.

    कोपरगाव बिबट्या ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, अहिल्यानगर : गेल्या अनेक महिन्यांपासून कोपरगाव तालुक्याच्या वेशीवर घोंघावणारं ‘मृत्यूचं सावट’ अखेर दूर झालं आहे. परिसरात नरभक्षक बिबट्याने उडवलेल्या दहशतीचा वन विभागानं काल शनिवारी मध्यरात्री समोरासमोर खात्मा केला आणि तालुक्याच्या जनतेनं सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या बिबट्याने अनेक नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले केले. विशेषतः टाकळी शिवारात एका बालिकेचा आणि येसगाव शिवारात एका वृद्ध महिलेचा बळी घेऊन त्याने हिंस्रतेची परिसीमा गाठली होती. या हृदयद्रावक घटनांमुळे संतप्त नागरिकांनी दोनदा रास्ता रोको आंदोलन केलं होतं. जनतेच्या वाढत्या दबावानंतर, आजी-माजी आमदारांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आणि वरिष्ठ स्तरावरून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवली.

    परवानगी मिळाल्यानंतर वन विभागाने हा ‘नरभक्षक’ बिबट्या शोधण्यासाठी सलग सहा दिवस कोपरगाव तालुक्याच्या विविध भागात अहोरात्र ‘सर्च ऑपरेशन’ राबवलं. अखेर, काल शनिवारी मध्यरात्री वन विभागाच्या पथकाला कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात या बिबट्याला शोधण्यात यश आलं आणि त्यांनी त्याला जागीच ठार केलं. या अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी जिल्ह्याचे व कोपरगावचे वन अधिकारी, तसेच विविध भागांतील वन कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलं. त्यांच्या या साहसी कामगिरीवर नागरिकांनी सध्या तरी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, परिसरात असलेल्या इतर बिबट्यांकडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले सुरू आहे. त्यामुळे इतर बिबट्यांचा देखील तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

    Maharashtra TimesNagpur News: ‘आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा’; भाजप नेत्याच्या हत्येनंतर नागपुरात तणाव, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

    माऊलीच्या डोळ्यासमोर पोटच्या लेकरांचा करुण अंत

    दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्या भाऊ-बहिणीचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना आज शनिवारी रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सार्थक गणपत बढे (वय 19) आणि सुरेखा गणपत बढे (वय 18) अशी मयत झालेल्या सख्या भाऊ-बहिणीची नावं आहेत. ते दोघेही कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रहिवासी होते.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा