Ambadas Danve On Ajit Pawar: अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून आरोप करण्यात आले आहेत. हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले असले तरी पार्थ पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.
अंबादास दानवे यांनीही या प्रकरणात प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. कोणीतरी सांगितल्याशिवाय एका तहसीलदाराची एवढी हिंमतच होऊ शकत नाही. त्यामुळे तहसीलदाराचा बळी देऊन पार्थ पवार आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवणे चुकीचे आहे. पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यादिवशी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकांमध्ये मला मिळालेला माहितीनुसार, अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो, अशी भूमिका घेतली. मी दाव्याने हे बोलतोय. खरेखोटे बाहेर येईलच, असेही दानवे म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी मंत्री, आमदार, खासदारांना कामाला लावलं; नगरपंचायत- नगरपरिषद निवडणूक प्रभारींची मोठी यादी जाहीर
भाजपनेच अडचणीत आणायचे आणि त्यांनीच बाहेर काढायचे असे काम यात झाले आहे. कंपनीचा संचालक असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही? मुद्रांक शुल्क चुकवले जाते म्हणून कारवाई होते. व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचे, असेही सांगितले जाते. मात्र, जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही हा नियम आहे, असे दानवे म्हणाले.
Milind Narvekar : महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? मिलिंद नार्वेकरांसोबत फोटो, सरनाईक म्हणाले, एकत्र काम करण्याची संधी…
गुन्हेगार म्हणून वागणूक द्या
पार्थ पवार लहान बाळ नसून लोकसभेची निवडणूक लढलेला उमेदवार आहे. त्यामुळे भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
भाजपनेच अडचणीत आणायचे आणि त्यांनीच बाहेर काढायचे असे काम यात झाले आहे. कंपनीचा संचालक असतानाही पार्थ पवारावर गुन्हा दाखल का होत नाही? –अंबादास दानवे, नेते, शिवसेना उबाठा
