Jalna Couple has Ended Their Lives : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहिती प्रेमीयुगुलाने डोंगरात जाऊन आत्महत्या केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ (वय 28) तर जयाबाई पांडुरंग गवळी (वय 40) या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधाची चर्चा संपूर्ण गावभरात व त्यांच्या नातेवाईकात होती. त्यामुळे या दोघांमध्ये व त्यांच्या नातेवाकांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली व अजिंठा पर्वत रांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिंका देवी डोंगराच्या जंगलात गेले.
नंदूरबारमध्ये मोठी दुर्घटना, 20 ते 30 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस दरीत कोसळली, किंकाळ्या आणि हाहाकार…
त्यानंतर हे प्रेमीयुगुल आज सकाळी अंदाजे 3 ते 4 वाजेच्या सुमारास हे दोघांनी मोटरसायकल घेऊन या कालिंका देवीच्या अजिंठा पर्वतरांगाच्या डोंगरात गेले. काही काळ सोबत घालवला व दोघांनीही गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला. यावेळी या मयत तरुणाने त्याच्या काही मित्रांना कॉल करून सांगितलं होतं की, आम्ही अशी आत्महत्या करणार आहे. त्यामुळे या मित्रांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्हीही प्रेमीयुगुल लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
Buldhana Accident : मुंबईतील बँकेत CA, 12 तारखेला होतं लग्न, घरी सर्व तयारी झालेली पण त्याआधी होत्याचं नव्हतं झालं, BKC मध्ये…
यावेळी त्यांची पाहणी व तपासणी केली असता पुरुषाचं नाव गणेश वाघ व महिलेचं नाव जयाबाई पांडुरंग गवळी असं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी पंचायत समक्ष मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर ताठे मॅडम यांनी दोघांनाही मृत घोषित केलं. यावरून पारद पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र, या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलं आहे. यावेळी घटनास्थळी पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे,पुढील तपास पोलीस करत आहेत.

