• Sat. Mar 7th, 2026
    मित्रांची गणपतीपुळ्याची ट्रिप ठरली घातक; तिघे समुद्रात पोहायला उतरले आणि अचानक…

    Friends drown in Ganpatipule: रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी तिघे समुद्रात बुडाले. जीवरक्षकांच्या मदतीने दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पर्यटकांच्या अति उत्साहामुळे आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या तिघेजण समुद्रात बुडाले आहेत. यापैकी एकाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. प्रफुल्ल दिनेश त्रिमुखे ( वय 26 गोवंडी मानखुर्द) त्याचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश काजवे (वय 25, रा. परेल-लालबाग), भीमराज आगाळे (वय 24, रा. कल्याण) आणि विवेक शेलार (वय 25, रा. विद्याविहार),आदर्श धनगर (वय 26, रा. गोवंडी).

    खोल समुद्रात जाणे पडले महागात

    हे पाच कॉलेजमधील मित्र गणपतीपुळे देवदर्शन व पर्यटनासाठी शुक्रवारी सकाळी आले होते. हे सर्वजण एका खाजगी लॉजमध्ये थांबले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रात आंघोळ करत असताना प्रफुल्ल, भीमराज आणि विवेक हे तिघे खोल पाण्यात गेले. काही वेळानंतर ते तिघे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी हे दृश्य पाहताच आरडाओरडा करायला सुरूवात केली.Maharashtra Timesनाईट शिफ्ट संपली, घरी जात असताना अचानक मोठी दुर्घटना

    ही घटना लक्षात येताच मोरया वॉटर स्पोर्ट्सचे जीवरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाडसाने समुद्रात उडी घेतली. त्यावेळी त्यांना तिन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले पण त्यापैकी दोन मित्रांने वाचवणे शक्य झाले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, भीमराज आगाळे व विवेक शेलार यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    अजित पवारांवर आरोप, सुप्रिया सुळेंवर जमीन हडपल्याचा दावा…काळूराम चौधरी संतापले

    चेतावणी देऊनही गेले समुद्रात

    त्यांना तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्यांना मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांनी समुद्रात धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न केला मात्र एका युवकाचा मृत्यू झाला. समुद्रात जाऊ नका असं सांगूनही अनेकदा पर्यटक उत्साहाच्या भरात स्थानिकांच्या सूचनांचे पालन करत नाहीत म्हणून गणपतीपुळे समुद्रात अलीकडे वारंवार अशा स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनेची नोंद रत्नागिरी जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पर्यटकांच्या अति उत्साहामुळे गणपतीपुळे परिसरात या घटना वारंवार घडू लागले आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा