• Wed. Jun 17th, 2026
    Sudhir Mungantiwar: आचारसंहितेला खोल खड्ड्यात गाडले पाहिजे; सुधीर मुनगंटीवार यांचे खळबळजनक वक्तव्य

    Sudhir Mungantiwar: आचारसंहितेला खोल खड्ड्यात गाडले पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. काय कारण?

    सुधीर मुनगंटीवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकांची कामे करता येत नाही. अशा आचारसंहितेला पृथ्वीच्या १२ किलोमीटर खोल खड्ड्यात गाडले पाहिजे. निवडणूक आयोगाचा अतिरेक आता थांबला पाहिजे, असे खळबळजनक मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

    चंद्रपूर येथे शुक्रवारी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नसताना विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत . या निर्णयाने ग्रामीण मतदारांवर अन्याय झाला आहे. काहीही फायदा नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याचा विचार झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे . देशात आणि राज्यात निवडणुकांच्या काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेवरून आमदार मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे नियम बदलले; जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार, महसूल विभागाचा मोठा निर्णय
    विधानसभा निवडणुकीसारख्या मोठ्या निवडणुकांसाठी आचारसंहिता समजू शकते. मात्र, विविध निवडणुकांमुळे प्रशासनावर सतत निर्बंध येत असतील तर विकासकामे कशी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पाच वर्षांत तब्बल ३१५ दिवस आचारसंहिता लागू राहते. त्यात शनिवार-रविवार, सण-उत्सवांच्या सुट्ट्या धरल्या तर शेकडो दिवस कामकाज ठप्प राहते. सरकार अडीच लाख कोटी रुपये पगारावर खर्च करते, ते काम न करण्यासाठी नाही, असा टोला त्यांनी लगावला.

    Maharashtra TimesAmol Mitkari: सुनेत्रा पवारांची राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची चर्चा; हा अजितदादांचा दरारा असणारा पक्ष, मिटकरींची अस्वस्थता उघड
    निवडणूक आयुक्तांशी चर्चा करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही. हा अतिरेक लोकशाहीसाठी मारक आहे. विकासकामे थांबवणाऱ्या आणि प्रशासनाला निष्क्रिय करणाऱ्या अशा निवडणुका व अशी आचारसंहिता नको, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

    माघार घेणाऱ्या उमेदवारांची हकालपट्टी
    विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला अंधारात ठेवून माघार घेतलेले काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे (यवतमाळ) आणि शैलेश अग्रवाल (चंद्रपूर) यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. येत्या १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून यवतमाळ मतदारसंघासाठी साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या दोघांनीही पक्षाशी चर्चा न करता गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. परिणामी, दोघांची हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून, या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा