Sudhir Mungantiwar: आचारसंहितेला खोल खड्ड्यात गाडले पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. काय कारण?
चंद्रपूर येथे शुक्रवारी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नसताना विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत . या निर्णयाने ग्रामीण मतदारांवर अन्याय झाला आहे. काहीही फायदा नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याचा विचार झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे . देशात आणि राज्यात निवडणुकांच्या काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेवरून आमदार मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
Maharashtra Decentralises Govt Land Powers: शासकीय जमिनींच्या व्यवहारांचे नियम बदलले; जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे अधिकार, महसूल विभागाचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीसारख्या मोठ्या निवडणुकांसाठी आचारसंहिता समजू शकते. मात्र, विविध निवडणुकांमुळे प्रशासनावर सतत निर्बंध येत असतील तर विकासकामे कशी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पाच वर्षांत तब्बल ३१५ दिवस आचारसंहिता लागू राहते. त्यात शनिवार-रविवार, सण-उत्सवांच्या सुट्ट्या धरल्या तर शेकडो दिवस कामकाज ठप्प राहते. सरकार अडीच लाख कोटी रुपये पगारावर खर्च करते, ते काम न करण्यासाठी नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Amol Mitkari: सुनेत्रा पवारांची राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची चर्चा; हा अजितदादांचा दरारा असणारा पक्ष, मिटकरींची अस्वस्थता उघड
निवडणूक आयुक्तांशी चर्चा करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही. हा अतिरेक लोकशाहीसाठी मारक आहे. विकासकामे थांबवणाऱ्या आणि प्रशासनाला निष्क्रिय करणाऱ्या अशा निवडणुका व अशी आचारसंहिता नको, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
माघार घेणाऱ्या उमेदवारांची हकालपट्टी
विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला अंधारात ठेवून माघार घेतलेले काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे (यवतमाळ) आणि शैलेश अग्रवाल (चंद्रपूर) यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. येत्या १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून यवतमाळ मतदारसंघासाठी साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, या दोघांनीही पक्षाशी चर्चा न करता गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. परिणामी, दोघांची हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून, या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
