Kolhapur News : कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं नक्की झालं आहे. काल तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती बैठक पार पडली, त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सक्षम उमेदवारीवर देणार भर
या बैठकीमध्ये “उमेदवार निवडताना नुसते पक्षीय हित न पाहता निवडून येण्याची क्षमता, सामाजिक व आर्थिक आधार, आणि पुरेसा समन्वय अशा निकषांवरच जागा दिल्या जातील,” असा ठाम निर्धार करण्यात आला. जागावाटपाचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर प्रत्येक घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष चर्चेतून सामोपचाराने घेणार आहेत. कुठे तिढा आला, तर तो निर्णय आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या घरी मुंबई पोलिसांची नोटीस धडकली, मुंडेंसोबत वाद असताना चौकशीसाठी मुंबईत बोलावलं; प्रकरण काय?
दोन दिवसांत विशेष बैठक
या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांना औपचारिकरित्या आघाडीमध्ये सामील करण्यासाठी पुढील दोन दिवसांत खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे गट एकजुटीने विरोधात येण्याच्या तयारीत आहेत.
कार्यकर्त्यांमधील उत्साही वातावरण
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, पाच नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणी, गटांतर्गत समन्वय, आगामी प्रचार आणि कार्यकर्त्यांमधील नवा उत्साह दिसून येतो आहे.
Nashik News: दोन आंबेडकरांमध्ये राजकीय युद्ध! वंचितचे 200 निष्ठावंत आनंदराज आंबेडकरांना साथ देणार, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार
विरोधकांची सत्ता मोडण्यासाठीच एकी
या निर्णयामुळे, स्थानिक स्तरावरील जागावाटप, उमेदवारी, आणि आघाडी धर्माशी प्रामाणिक राहून प्रचार करण्यावर महाविकास आघाडीचा कटाक्ष राहणार आहे. सर्व नेत्यांनी बैठकीत “विरोधकांना रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्षीय भेद विसरून आघाडीच्या झेंड्याखाली काम करावे,” असा संदेश दिला आहे.
Beed News : ’25 कोटींची ऑफर मी नाकारली, म्हणून…’, गंगाधर काळकुटेंचं धनंजय मुंडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर; बीडमध्ये वातावरण तापलं
दरम्यान, या बैठकीसाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, नितीन बानुगडे-पाटील, विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही. बी. पाटील, सचिन चव्हाण, अन्य जिल्हा व शहर स्तरावरील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

