• Fri. Jul 24th, 2026

    शिंदेंच्या शिलेदाराला फडणवीसांच्या शिलेदाराचं उत्तर, महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं जळगाव केंद्र ठरणार?

    शिंदेंच्या शिलेदाराला फडणवीसांच्या शिलेदाराचं उत्तर, महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचं जळगाव केंद्र ठरणार?

    महायुतीत सध्याच्या घडीला सारं काही ठिक आहे, असं म्हणता येणार नाही. कारण सत्ताधारी शिवसेनेचे आमदार भाजपवर टीका करत आहेत. तर भाजपकडूनही तसेच प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात या कलहाचा मोठा फुगा फुटतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं असलं तरी सत्ताधारी महायुती पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. कारण अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षांमधला मतभेद उफाळून येताना दिसतोय. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात टोकाचा वाद दिसतोय. तर जळगावमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपात सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीरपणे भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला आता चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हा वाद जास्त टोकाला गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित वेगळ्या गोष्टी घडू शकतात आणि त्याचं केंद्र कदाचित जळगाव असू शकतं का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

    नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाढल्यानंतर आता राजकीय नेत्यांचे देखील फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. पाचोरा येथे आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंगेश चव्हाण होते. त्यांनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की, चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक निवडून आणून दाखवावे. मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. त्यांनी पाचोर्‍यामध्ये येऊन किशोर पाटील यांना आव्हान दिलं आहे.

    शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा नुकताच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा येथे पार पडला होता. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कवडी देखील निधी आम्हाला दिला नसल्याची खंत भर सभेत त्यांनी बोलवून दाखवली होती. आज भारतीय जनता पार्टीचा पाचोरा येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती लाभणार होती. मात्र ते या मेळाव्याला गैरहजर राहिले. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित सभेला संबोधित करताना सांगितले की, “किशोर आप्पा हे माझे आमदार होण्यापूर्वीचे चांगले मित्र आहेत आणि होते. त्यांना मदत करून देखील ते जाहीर सांगतात की, भाजपने मला मदत केली नाही.”
    Maharashtra Timesशरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुणासोबतही आघाडी करण्यास तयार, फक्त एक पक्ष सोडून!
    “खरंतर असे म्हणतात की, पोलिसासोबत मैत्री करू नये. आम्ही ती मैत्री केली होती. मात्र मैत्री निभवणे हा ठराविक लोकांमध्येच गुण असतो. तुम्ही चांगले राजकीय नेते देखील भविष्यात होऊ शकतात. पण आयुष्यात चांगले मित्र तुम्ही कदापि राहू शकत नाही”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

    “दिलीप वाघ खरं तर तुमची चूक होती, तुम्ही सांगितले की माझा बजेट कमी आहे. आता यांनीही सांगितले आहे की, दिलीप भाऊंनी सर्व बजेट वाढवलेला आहे. त्यामुळे दिलीप भाऊंचा असा बजेट वाढलेला आहे सर्व गोष्टींची कमी पडणार नाही. तुम्ही देखील अचंबित व्हाल”, असं वक्तव्य मंगेश चव्हाण यांनी केलं.
    Maharashtra Timesपडद्यामागे हालचाली? महायुतीमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, शिंदेंच्या आमदाराने जाहीरपणे भाजपविरोधात दंड थोपटले
    “गिरीश भाऊंनी देखील सांगितलेले आहे, आमंत्रण देताना सर्वांना आमंत्रण दिले गेले पाहिजे. चुलीला निमंत्रण पाहिजे. कुठेही बजेट कमी पडता कामा नये. त्यामुळे आम्ही आता तुमच्यासोबत असल्याने कुठल्याही बजेटची कमी पडणार नाही किंवा संपणार नाही. याची तुम्ही चिंता करू नये. भर सभेत किशोर आप्पा सांगतात की, मुख्यमंत्र्यांनी एक दमडी आम्हाला एका वर्षात दिली नाही. तुमची दानत नाही म्हणून तुम्ही निधी तुमच्या मतदारसंघात आणू शकत नाही”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.
    Maharashtra Timesराज ठाकरे सोबत नको? काँग्रेसच्या गोटात हालचाली, पडद्यामागे काय सुरु?
    “चाळीसगावला जाताना मला पाचोरा, भडगाव लागतील. त्यामुळे येणे-जाणे या रस्त्यावर माझे सुरू असते. मात्र किशोर आप्पांना असे वाटते की हा पाचोरामध्ये लक्ष घालत आहे. किशोर पाटलांनी देखील चाळीसगाव येथे येऊन सभा घेतली. बैठकी घेतली. मी तर किशोर आप्पांना आव्हान देतो, तुम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. यात माझे दुमतही नाही. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा. अप्रत्यक्षरीत्या मी तुमची मदत करेन. मात्र चाळीसगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक तरी निवडून आणून दाखवावे. किशोर पाटलांचा पाचोऱ्यात येऊन जाहीर सत्कार करेन”, असे खुले आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांना दिले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा