Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पेल्हार येथील रहिवासी असलेले शहजाद गुलाम उस्मानी व त्यांचा मुलगा आतिफ शहजाद उस्मानी हे दोघेजण कामानिमित्त स्वतःचीच रिक्षा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार परिसरातील पेट्रोल पंपनजीक एक भरधाव वेगातील ट्रक आणि दोघे पितापुत्र प्रवास करत असलेल्या रिक्षाचा भीषण असा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा पूर्णतः दबली गेली. अपघातात रिक्षातून प्रवास करत असलेले दोघे पिता पुत्र शहजाद गुलाम उस्मानी व आतिफ शेहजाद उस्मानी हे गंभीररित्या जखमी झाले.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या नवा बॉम्ब टाकणार? महत्त्वाची माहिती समोर
दोघांना उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेल्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद पेल्हार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Solapur Crime: एकाने गळ्याला कोयता लावला, दुसऱ्याने…; बंदुकीच्या धाकावर दोघांचा ज्वेलरी शॉपवर दरोडा, पण, पुढे असं काही घडलं की….
अलिबागमधील समुद्रात दुर्दैवी घटना!
रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर काल शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. उलवे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोनजण समुद्रात बुडून बेपत्ता झाले असून, दोन जणांना बचावण्यात आलं आहे. 22 तास उलटूनही बेपत्ता तरुणांचा शोध लागलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय मणियार, आदर्श अभी, शशांक सिंग आणि पलाश पखर (सर्व रा. उलवे, सानपाडा) हे चार मित्र काल शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते.

