Balasaheb Thorat Praises Nitin Gadkari : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचं कौतुक केलं आहे. यावेळी थोरातांनी बऱ्याच विषयांवर भाष्य केलं.
आज रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील म्हस्के यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी थोरात बाभळेश्वर येथे आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार उपस्थित राहणार होते. मात्र, हेलिकॉप्टर टेकऑफसाठी योग्य वातावरण नसल्याने त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने ते येऊ शकले नाही. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी रावसाहेब पाटील म्हस्के यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
पडद्यामागे हालचाली? महायुतीमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, शिंदेंच्या आमदाराने जाहीरपणे भाजपविरोधात दंड थोपटले
अजित पवारांना शेतकरी माफ करणार नाही
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी फुकट किती द्यायचं? असं वक्तव्य शेतकऱ्यांच्या संदर्भात केलं होतं. यावरून थोरात यांनी पवारांना चांगलंच सुनावलं. ‘अर्थमंत्र्यांकडून असं वक्तव्य येणं शोभणारं नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही जनतेनं मतं दिली म्हणून सत्तेत आहात. फुकट किती द्यायचं म्हणता? शेतकरी त्यांना माफ करणार नाही,’ असा सणसणीत इशारा थोरात यांनी दिला.
निवडणूक आयोगाने उत्तरे द्यावी
राहुल गांधींनी जे पुरावे दिले त्यावर निवडणूक आयोगाने थातूर मातूर उत्तर दिलं. भाजप उत्तरे देतंय, कोणीतरी बाहेरचा आहे कोणी तरी आयोगाला चालवतंय असं वाटतंय. आदित्य ठाकरे किंवा राहुल गांधीच्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावी, खिजवून बोलणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कालचं निमत्रंण सर्व पक्षांना दिल होतं, मात्र ते आले नाहीत.
Pune Crime : गणेश काळे प्रकरण; आरोपी बंडू आंदेकरच्या नातवाचे मित्र, पुण्यातील आंदेकरांची तिसरी पिढी गुन्हेगारीच्या विश्वात?
राज्यात निष्काळजी कारभार; निराधारांना वाली कोण?
थोरात यांनी केवळ राजकीय टीका न करता, सरकारच्या निष्काळजी कारभारावरही बोट ठेवलं. कंत्राटदारांचे 1 लाख 40 हजार कोटींचे बिल थकले असताना, निराधार आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे पैसे वर्षभर मिळाले नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ‘वर्ष झालं तरी निराधार, वयोवृद्ध लाभार्थ्यांना शासकीय योजनेचे पैसे मिळत नाहीत. अशी परिस्थिती असेल, तर ते राज्य कुचकामी समजावं. जे निराधाराची काळजी घेऊ शकत नाही, त्यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही,’ अशा कठोर शब्दांत त्यांनी राज्यकारभारावर ताशेरे ओढले.
नवं नेतृत्व घडवण्याची संधी म्हणून पक्षांतराकडे
काँग्रेसमधून सुरू असलेल्या आऊटगोईंगवर (पक्षांतर) थोरात यांनी शांतपणे, पण सूचक प्रतिक्रिया दिली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होत आहे. पण, आमच्या दृष्टीने ही नवं निर्मितीची संधी आहे. अशावेळीच नवं नेतृत्व तयार होत असतं,’ असं ते म्हणाले.
राज-उद्धव यांच्या लढ्याला मोठं यश येणार? डॉ. नरेंद्र जाधव यांचं सूचक वक्तव्य
तांबे आता स्वतंत्र, सज्ञान
आमदार सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबद्दल विचारले असता, थोरातांनी थेट बोलणे टाळले. ‘ते आता स्वतंत्र आहे आणि सज्ञान आहे. त्यांना सगळ्या पक्षातील नेत्यांनी मतदान केलं आहे. त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात,’ असं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.
तुम्ही माईक ठेऊन प्रचाराला लागले तरी
सुजय विखेंनी संगमनेर मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तयारी सुरू केली यावर विचारले असता थोरात म्हणाले, ‘त्यांना तो अधिकार, देशात कोणी कोठेही जावू शकतात. संगमनेरला जाण्याचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. मीही कुठेही जावू शकतो. तुम्ही माईक ठेवून कोणाच्या प्रचाराला लागले तर कोणी हरकत घेऊ शकत नाही,’ अशा शब्दात थोरातांनी पत्रकारांना उत्तर दिलं.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा
