• Wed. Mar 11th, 2026

    ‘सध्याचे प्रतिनिधी माझ्या कामाचे 2 टक्केही काम करू शकले नाहीत,’ माजी खासदार सुजय विखे यांचा निलेश लंकेवर टोला

    ‘सध्याचे प्रतिनिधी माझ्या कामाचे 2 टक्केही काम करू शकले नाहीत,’ माजी खासदार सुजय विखे यांचा निलेश लंकेवर टोला

    Sujay Vikhe: माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीका करत, ‘मी पदासाठी नाही, सेवेसाठी आलो आहे,’ असे ठामपणे सांगितले. मागील एका वर्षात केलेल्या कामाच्या तुलनेत सध्याचे लोकप्रतिनिधी दोन टक्केही काम करू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

    अनिकेत यादव, अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्षपणे टीकेचे बाण सोडले. “मी पदासाठी नाही, सेवेसाठी आलो आहे. माझी ओळख कुठल्याही पदावरून होत नाही; मी खासदार असलो काय, नसलो काय, विखे परिवार आणि आमदार संग्राम जगताप हे जनतेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध आहेत,” असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले.

    डॉ. विखे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “मागच्या एका वर्षात मी केलेल्या कामाच्या दोन टक्के कामही सध्याचे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत.” या वक्तव्यातून त्यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “मी पराभूत झालो तरी खचलो नाही, कारण जनतेला काही लोकांच्या भरोशावर सोडणे योग्य नाही. आपण थांबलो तर जनतेकडे कोण पाहणार? आम्ही सेवेसाठी काम करतच राहणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesUddhav Thackeray: पुराव्यांनिशी आता न्यायालयात जाणार; ‘सत्याचा मोर्चा’मध्ये उद्धव ठाकरे यांची घोषणा

    कामाची जाहिरात केली नाही

    आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना डॉ. विखे म्हणाले, “आमचे सर्वात मोठे दुर्भाग्य हे की आम्ही केलेल्या कामाची जाहिरात कधी केली नाही. जे दाखवलं जातं त्यावर विश्वास ठेवू नका; माणूस ओळखायला शिका. योग्य माणूस ओळखायला शिकलात, तर पुढच्या 25 वर्षांसाठी तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल.”

    आरोग्य क्षेत्रातील विकासाबाबत बोलताना त्यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय’ नगरमध्येच स्थापन होणार असल्याची खात्री दिली. “काही लोक फक्त राजकारणासाठी मुद्दे निर्माण करतात, पण महाविद्यालय कुठे जाणार नाही; ते नगरमध्येच राहणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पाठबळामुळेच हे शक्य होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

    माणसाची ओळख कर्तृत्वामुळे होते

    स्वतःच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना डॉ. विखे म्हणाले, “माझा संघर्ष वैयक्तिक नाही. खासदारपदावर असताना काही जण माझं काम कमी लेखत होते, पण आज संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो, हे जनतेच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं. माणसाची ओळख पदामुळे नाही, तर कर्तृत्वामुळे होते.”

    Ajit Pawar | जमीन पाच एकर आणि ऊस हजार टन? अजित पवार म्हणाले तपासणी करणार

    शेवटी विरोधकांना इशारा देत त्यांनी म्हटलं, “आज जर निवडून दिलेले आणि पराभूत प्रतिनिधी रस्त्यावर उभे राहिले, तर जनतेची गर्दी कोणाकडे जास्त असेल हे सर्वांना माहिती आहे. जनतेला आता समजलं आहे की काम कोण करतं आणि विकास कोण घडवतो. आम्ही फक्त विकासासाठीच काम करणार.”

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा