Mumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे पुरावेच दिले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
‘हा राग आणि मोर्चा दिल्लीपर्यंत समजवण्याचा मोर्चा आहे. हा विषय तोच आहे, तो म्हणजे दुबार मतदाराचा. तुम्ही सर्व एवढ्या लांबून आलेत, मी सर्वांचे आभार मानतो. सगळेच बोलताय दुबार मतदार आहेत. भाजपचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. शिंदेंचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक बोलताय दुबार मतदार आहेत. मग निवडणूक घेण्याची घाई का?’ असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
Mumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडी अन् मनसेचा सर्वात मोठा मोर्चा; विरोधकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
‘आधी मतदारयाद्या साफ करा. त्यानंतर यश कुणाचं आणि अपयश कुणाचं हे सर्व आम्हाला मान्य आहे. लपून छपून कार्यक्रम कशासाठी करताय? काही मतदार जिथे राहतात तिथेही मतदान करताय आणि दुसरीकडे देखील मत देताय. असे लाखो लोकं आहेत जे दुबार मतदान करताय. लोकं बोलतील आकडे बोलून दाखवले आता पुरावे कुठेय?
मी पुरावे देखील आणले आहेत. पाच वर्ष निवडणूक घेतली नाहीय. एक पैठणचा आमदार सांगतो मी बाहेरुन मतदार आणतो. मी २०१७ पासून ओरडून सांगतोय. निवडणूक आयोगामार्फत हा मतदारांचा अपमान आहे. मतदान कुठेही करा, पण मॅच आधीच फिक्स्ड आहे’, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांना आणि निवडणूक आयोगाला चांगलंच सुनावलं आहे.
Sikandar Shaikh : पंजाबमध्ये सिकंदरला अटक, आजच होता वाढदिवस; वडील रशीद शेख यांचे मोठे विधान, त्याला…
दरम्यान, मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्मिळ झालं होतं. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळा वाढल्यानंतर आज पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र उतरल्याने राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष लागून राहिलं होतं. महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे.

