• Thu. Mar 12th, 2026
    Bacchu Kadu Farmers Protest : बच्चू कडूंना धक्का! लाखोंची गर्दी पांगवावी लागणार, कोर्टाकडून महत्त्वाचे आदेश; एका तासात…

    Bacchu Kadu Protest Nagpur : बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी आज नागपुरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरु केलं आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरुन घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत केली आहे.

    बच्चू कडू आंदोलन सुमोटो याचिका दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये तीव्र आंदोलन छेडलं आहे. नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर ‘रेल रोको’ आंदोलन करत प्रहार कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, ‘जोपर्यंत शेतकऱ्यांबाबत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’. मात्र, याचदरम्यान, बच्चू कडूंच्या आंदोलनासंर्भात कोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोर्चास्थळ रिकामे करण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल नागपुरात दाखल झाले आहेत.

    रेल्वे वाहतुकीवर परिणाम

    आज सकाळपासूनच नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते जमले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, थकलेली कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्याच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून नागपूर-मुंबई मुख्य मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प केली आहे. यामुळे नागपूरहून मुंबईकडे आणि विदर्भातील इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

    Maharashtra Timesपीडितेचं हातावरचं आणि पत्रावरचं हस्ताक्षर जुळत नाही? फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात सुषमा अंधारे यांचा सर्वात मोठा दावा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील

    प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही मुंबईला जाणार नाही. उलट सरकारने नागपूरला यावं आणि येथेच चर्चेद्वारे निर्णय घ्यावा.’ त्यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलं की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असूनही, विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहेत.’

    बच्चू कडू यांनी पुढे सांगितलं की, ‘सरकारने आजच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस घोषणा करावी. अन्यथा आंदोलन आणखी उग्र केलं जाईल आणि राज्यभर रेल्वे वाहतूक ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात येईल.’

    Maharashtra TimesWomen Doctor Hotel CCTV Footage : रजिस्टरमध्ये नावाची एन्ट्री, चावी घेऊन खोलीकडे गेली…; डॉक्टर तरुणीचा हॉटेलमधील 27 सेकंदाचा व्हिडिओ समोर

    दरम्यान, पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती करूनही ते मागे हटायला तयार नव्हते. मात्र विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवण्यात आलं. प्रहार संघटनेच्या या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र आंदोलन थांबवण्यासाठी चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा