• Tue. Mar 10th, 2026

    Maharashtra Weather: राज्यात पुढील तीन दिवस पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह सात जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

    Maharashtra Weather: राज्यात पुढील तीन दिवस पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह सात जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

    Mumbai Rain News: दिवाळीत मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि आसपासच्या भागात पुन्हा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: दिवाळीमध्ये मुंबईत पाऊस परतण्याचा अंदाज वरतवला गेला असला तरी, दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसाने मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी दिवाळीच्या उत्साहावर पाणी पडले असून आता हवामान विभागाने अंदाज लावला आहे की आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि आसपासच्या भागात पुन्हा हलका पाऊस पडेल. राज्यात मुंबई आणि ठाण्यासह 7 जिल्ह्यात यलो अलर्ट दिला गेला आहे.

    मंगळवारी (21 ऑक्टोबर) मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ-बदलापूर, वसई-विरार भागात हवामान उष्ण राहिले. दुपार नंतर ढग दिसू लागले आणि त्यानंतर मुंबई-महामुंबई भागात हलक्या वाऱ्यांसह पाऊस पडला. संध्याकाळी अचानक पडलेला पाऊस लक्ष्मी पूजनासाठी खरेदीला घराबाहेर आलेल्या लोकांसाठी अडथळा निर्माण करणारा ठरला. व्यापाऱ्यांनाही या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. आज संध्याकाळपासूनही पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

    Maharashtra Timesमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास होणार जलद! 10 पदरी सुपर हायवेचा प्रस्ताव मंजूर; जाणून घ्या कधी होणार काम पूर्ण

    पुढील तीन दिवस मुंबई-ठाण्यात पावसाची शक्यता

    हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात अधूनमधून वीजांसह हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही अलर्ट

    दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपर्यंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारीपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला गेला आहे. काल दुपारनंतर रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये काही ठिकाणी पुन्हा पाऊस सुरु झाला. वीज आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांना त्रास झाला. संध्याकाळी या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद झाला असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना अंधारातच लक्ष्मीपूजा करावी लागली.

    काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार

    पुण्यातही पावसाची दमदार हजेरी नोंदवली गेली असून, राज्यातील विविध भागांत हवामानात ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आठवड्याच्या अखेरीस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाची पुनरागमन शक्यता कायम आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा