Maharashtra Rain Update : कल्याणध्ये भर दिवाळीच्या उत्साहात पावसाने अचानकपणे एन्ट्री मारली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रचंड विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाट आणि वादळी वारे यामुळे संपूर्ण वातावरण बदलून गेलं आहे. शहरात अतिशय मुसळधार पाऊस सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना कल्याणमध्ये महाभयंकर पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आज दिवाळी सणाचा महत्त्वाचा दिवस आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात पावसाचं रौद्ररुप धारण केलेलं बघायला मिळत आहे. कल्याणसह बदलापूर, अंबरनाथ येथे देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वारे वाहत असल्याने अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळोखाचं वातावरण बघायला मिळत आहे. ऐकीकडे दिवाळी आहे. या दिवसांमध्ये घराघरात दिवे लावले जातात. घराबाहेर कंदील लावला जातो. पण ऐनवेळी आलेल्या पावसाने या सर्व उत्साहावर पाणी टाकलं आहे.
कल्याणमध्ये पाऊस सुरु होण्याआधी बदलापुरात आज संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बदलापुरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे नागरिक देखील भयभीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली. सध्या दिवाळीमुळे सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. अनेक जण फटाके खरेदीसाठी जात आहेत. पण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपिट झाली आहे. सर्वसामान्य नागरिंकाचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक व्यापाऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं आहे.
मुंबईच्या दादरमध्येही पाऊस
फक्त कल्याण नाही तर मुंबईच्या दादरमध्ये देखील आज पावसाने बॅटिंग केली आहे. सध्या दादरमध्ये रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. इथे पावसामुळे सर्वसामान्यांच्या घरातील वीज गेलेली नाही. पण कल्याणमध्ये पाऊस खूप पडतोय. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बंद झाला आहे. मुसळधार पावसाने अनेकांच्या आनंदावर विरझण पडलं आहे. हा पाऊस लवकर परत जावा, अशी प्रार्थना देवाकडे केली जात आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीत मोठं संकट, डॅमेज कंट्रोलसाठी अजित दादांचा खास माणूस मैदानात, जोरदार हालचाली दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढली होती. आज अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ऐन दिवाळीत पाऊस पडल्यामुळे नागरिकांचा मोठा हिरमोड झाला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा