Jalna Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात जालना जिल्ह्यात काल झाला आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
भोकरदन तालुक्यातील ताडकळस येथील विशाल पवार व त्यांची पत्नी वैष्णवी यांचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे शुभविवाह झाल्यानंतर देवदर्शन घेऊन पुढील संसाराची आखणी केली जाते व सुरुवात केली जाते. हेच करण्यासाठी हा परिवार मराठवाड्याचा आराध्य दैवत श्री. क्षेत्र राजुर येथे राजुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी दर्शन रांगेत उभे राहून व्यवस्थित गणरायाचं दर्शन घेतलं. विधीवत पूजन केलं व प्रसाद घेऊन आपल्या गावाकडे दुचाकी घेऊन ते मार्गस्थ झाले. सोबत लक्ष्मीबाई रंजित गोफणे या सुद्धा होत्या. दर्शन घेवून राजूरहून भोकरदनकडे दुचाकी क्रमांक MH 21 BN 6540 या दुचाकीवर विशाल पवार व त्याची पत्नी वैष्णवी आणि सोबत लक्ष्मीबाई रंजित गोफणे हे जाण्यासाठी निघाले.
Heavy Rain : कल्याणमध्ये महाभयंकर पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अनेक भागात बत्ती गुल
राजुर भोकरदन या मुख्य मार्गावर महेश हॉटेल पळसखेड ठोंबरे पाटीजवळ भोकरदनहून जालण्याकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 4 T 3445ने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये लक्ष्मीबाई रंजित गोफणे यांना डोक्याला, हाताला व पायाला जबर मार लागला आणि अतिरक्तस्राव होऊ लागला व यातच जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे, तर नवविवाहित महिला देखील गंभीर जखमी झाली. यावेळी हॉटेल परिसरात व रहदारी करणारे नागरिक तात्काळ थांबले आणि या जखमींना तात्काळ राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी लक्ष्मीबाई गोफणे यांना मयत घोषित केलं.
महायुतीत महाभारत! सुनील तटकरेंचा अत्यंत जवळचा माणूस शिवसेनेत, भरत गोगावले यांची मोठी राजकीय खेळी
जखमींवर जालना येथील एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, देवदर्शन करून घरी जाणाऱ्या या महिलेवर काळाने घाला घातल्यानं संपूर्ण भोकरदन तालुक्यात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नव्या संसाराला सुरुवात करण्याअगोदरच हे मोठं दु:ख समोर आल्यानं या नवीन दाम्पत्य देखील भयभीत झालं आहे. सदर अपघाताची नोंद राजूर पोलीस चौकीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेरे यांच्या आदेशावरून घेण्यात आली आहे. पुढील तपास सध्या पोलीस करत असून त्या ट्रकचालकावर कारवाईची मागणी सुद्धा परिसरातून होत आहे.

