• Fri. Mar 6th, 2026

    नवीन वर्षात होणार कल्याणवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्ती! जाणून घ्या SATIS पुल कधी खुला होणार नागरिकांच्या सेवेसाठी

    नवीन वर्षात होणार कल्याणवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्ती! जाणून घ्या SATIS पुल कधी खुला होणार नागरिकांच्या सेवेसाठी

    Kalyan SATIS Flyover: कल्याण रेल्वे स्थानकातील वाहतूक सुधारणा प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे.

    (Representative Image)
    म.टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे कोंडीने ग्रासलेल्या नागरिकांचे लागलेले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. अनेक अडचणी आल्यानंतर आता 2026मध्ये या उड्डाणपुलाचे काम अखेर पुर्ण होणार असून तो लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध केला जाणार आहे. यामुळे कल्याणमधील नागरिकांचा वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

    या उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 2 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. दरम्यान या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करत जानेवारी ते एप्रिल दरम्यान सॅटिस प्रकल्पासह सर्व उड्डाणपूल टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. यामुळे नव्या वर्षात स्टेशन परिसरातील कोंडी फुटणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    Maharashtra TimesBhiwandi News : खड्ड्यांमुळे बाईकवरुन पडला आणि क्षणात सगळं संपलं; हसता-खेळता एकुलता एक लेक गेला, कुटुंबाचा टाहो

    कल्याण डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या कामास 2021 साली सुरुवात करण्यात आली. 2023 मध्ये पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली. मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक बैलबाजार चौक दरम्यान 1630 मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, एसटी स्थानकाच्या जागेवर काम करण्यास लागणारी ना हरकत, रेल्वेची जागा, हॉटेल्सची बांधकामे, गाळे धारकांचे पुनर्वसन यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. आता यातील १३४६ मीटरचे काम पूर्ण झाले असून अडथळे दूर झाल्याने उर्वरित काम देखील वेगाने पूर्ण करणे शक्य होऊ शकेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

    कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला

    अडथळे दूर होणार

    या प्रकल्पात रेल्वे स्थानक परिसरात एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ प्रवासी पादचारी मार्गिका उपलब्ध करून दिल्या जाणार असून शहराबाहेरून येणारी वाहने रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत अशा पद्धतीने उड्डाण पुलावरून परस्पर निघून जावीत अशा पद्धतीने या पुलाची उभारणी केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा