Bhiwandi Bike Accident : भिवंडीत खड्ड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अपघातात तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने ऐन दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हसता – खेळता लेक गेला, क्षणात सगळं संपलं
राज आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी जात असताना अचानक रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. दोघेही रस्त्यावर कोसळले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या एका कंटेनरने राजला चिरडलं. क्षणभरात सर्व काही संपलं. काही क्षणांपूर्वी हसत – खेळत घरी जाणारा तरुण क्षणात मृत्यू झाला. राज हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.
Jalna News : अंगावर लोखंडी सळ्या पडल्या, कामगाराचा तडफडून मृत्यू; माझी लेकरं उघड्यावर पडली, पत्नीचा टाहो
राज बी.कॉमचा विद्यार्थी होता. अभ्यासू आणि आयुष्याबद्दल मोठी स्वप्नं बाळगणारा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाती मृत्यूने परिसरात शोककळ पसरली असून मित्रमंडळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
खरेदी करुन पती-पत्नी घरी परतत होते, पण नियतीने दोघांची गाठ सोडली; ऐन दिवाळीत घरचा कर्ता गेला… कुटुंबाचा टाहो
वर्षभरात शहरात खड्ड्यांमुळे 6 बळी
या अपघातासंदर्भात शांतीनगर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास शांतीनगर पोलीस करत आहेत. राजच्या मृत्यूनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ‘आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा सवाल मृत राजच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
दरम्यान, भिवंडीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहर असो वा ग्रामीण भाग सगळीकडेच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. या वर्षभरात खड्ड्यांमुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात 6 जणांचा बळी गेला आहे. तरीदेखील प्रशासन मात्र ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे.शहरा

