• Sun. Mar 15th, 2026
    Sharad Pawar : शेतकरी संकटात, आपण का दिवाळी साजरी करायची? सरकारवर संतापलेल्या शरद पवारांनी केली मोठी घोषणा

    Baramati News Sharad Pawar : शरद पवार यांनी शेतकरी संकटात असताना, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.

    Sharad Pawar | अतिवृष्टीमुळे शेतकरी अस्वस्थ, शरद पवार दिवाळी साजरी करणार नाहीत; सरकारवर टीकास्त्र

    दीपक पडकर, बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गोविंद बागेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यावर्षीची दिवाळी साजरी करणार नाही अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. त्या बरोबरच त्यांनी राज्य सरकारने ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे, त्या पद्धतीने करत नाही, अशी खंत व्यक्त केली. मात्र या प्रकरणात राजकारण आणले जात आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्या जोडीला राज्य सरकारने जसे प्रयत्न करायला हवे तसे प्रयत्न केले जात नसल्याबद्दल देखील खंत व्यक्त केली.‌

    शरद पवार म्हणाले, दिवाळीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सगळ्या सहकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला की, दिवाळी साजरी करायची नाही. कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती उध्वस्त झाली. तिथल्या जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकरी अस्वस्थ आहे आणि तो दिवाळी करण्याच्या मनस्थितीत नाही तर आपण का दिवाळी साजरी करायची असा निर्णय घेतला आहे.
    Pune News : पुण्यात 28 किमीचा नवा बोगदा, तीन वर्षात काम पूर्ण होणार; खडकवासलापासून टनल खोदाई यु्द्धपातळीवर सुरू, कसे असणार मार्ग?
    शरद पवार म्हणाले, आम्हाला यात राजकारण करायचे नाही. मात्र ज्यांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे, त्यांनी या शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारने केलेली मदत तोकड्या स्वरूपाची असून, त्यामध्ये त्यांचं कुठलंही नुकसान भरून येऊ शकत नाही. शेतकऱ्याला त्याची जमीन हेच त्याचं सर्वस्व आहे. या महापुरात याचं सर्वस्व गेलं आहे. त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

    आगामी निवडणुका, बारामतीतील भ्रष्टाचार, दिवाळी पाडवा ते अजितदादांची भेट; युगेंद्र पवारांची उत्तरं!

    अर्थात ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सत्ता आहे. त्यांची शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी असते. लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावायचा असतो. आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम लोकांना जाहीर केली. मात्र नुकसानीचं स्वरूप बघितलं, तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला शेतकऱ्याला उभं करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे. मात्र या प्रश्नाकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. राजकारण करायचं नाही. मात्र संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्टा करायला पाहिजे. ती तयारी आम्ही राज्य सरकारला दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी राज्य सरकारची दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने आजची दिवाळी नाही, असं शरद पवार म्हणाले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा