• Thu. Mar 19th, 2026

    जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 17, 2025
    जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले – महासंवाद




    मुंबई, दि. १७ : ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    ‘आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्यानगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदारसंघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डिले यांच्या निधनाने कर्डिले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed