Bhupati’s Surrender Reason Revealed: गडचिरोलीत माओवादी नेता भूपती आणि त्याचे 60 साथीदार मुख्य प्रवाहात परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नी तारक्काच्या आर्त हाकेचाही यावर परिणाम झाला.
भूपती आणि त्याच्या साथीदारांने लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, पोलिसांच्या सततच्या कारवाईनंतर त्यांच्याकडे शस्त्र टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.परंतू असे मानले जात आहे की, त्याच्या आत्मसमर्पणामागचं खरं कारण केवळ पोलिसांचा दबाव नसून तर त्याची पत्नी तारक्का हिचं आर्त आवाहन आणि दीर्घकाळाचं प्रेम हे होतं.
भूपतीने अखेर शस्त्र टेकले! माओवाद्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती; 60 साथीदारांचेही आत्मसमर्पण
40 वर्षांचे प्रेम
भूपती आणि तारक्काच्या प्रेमकथेची सुरुवात 1986 मध्ये झाली. गडचिरोली जिल्ह्यातील किष्टापूर येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणी विमला उर्फ तारक्का माओवादी संघटनेत सामील झाली आणि त्याच दरम्यान तिची भेट मूळ तेलंगणातील आणि गडचिरोलीत सक्रिय असलेल्या भूपतीशी झाली. संघटनेत एकत्र काम करत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि विवाहबंधनात अडकले. लग्नावेळी विमलाचं वय अवघं 17 वर्षे होतं. लग्नानंतर ती “तारक्का दीदी” म्हणून ओळखली जाऊ लागली आणि दंडकारण्यात झोनल समिती सदस्य पदावर कार्यरत राहिली.
तारक्काने दाखवला मुख्य प्रवाहाचा मार्ग
माओवादी संघटलनेत सक्रिय असताना तारक्कावर तब्बल 66 गुन्हे दाखल होते आणि पोलिसांनी तिच्यावर 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र प्रकृतीच्या कारणांमुळे तिनं 1 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं आणि मुख्य प्रवाहात परतली. रक्कानं शस्त्र खाली ठेवल्यानंतर ती वेळोवेळी आपल्या पतीला भूपती ऊर्फ सोनूला मुख्य प्रवाहात परत येण्याचं आणि शरण जाण्याची विनंती करत होती.
तारक्काचं 40 वर्षांचं प्रेम आणि तिची आर्त विनंती विसरणे भूपतीला शक्य झाले नाही. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नीच्या भावनिक आवाहनाचाही परिणाम म्हणून अखेर भूपतीनं 15 ऑक्टोबरला 60 नक्षली साथीदारांसह आत्मसमर्पण केलं.
बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं!
पत्नीला पाहताच भूपतीचा चेहरा फुलला
समर्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तारक्काला देखील मंचावर बोलावण्यात आलं. भूपतीनं तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या दोघांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या आत्मसमर्पणानंतर भूपती आणि तारक्का या दोघांनाही समाजात सन्मानाने नव्याने जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. नक्षलवाद्यांना शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि सी-60 दलाने राबवलेल्या प्रभावी धोरणाचं हे मोठे यश मानले जात आहे.

