• Mon. Mar 9th, 2026
    मतदारयादीत मुलीचं वय १२४, वडिलांचं वय ४३ वर्ष, कुणी कुणाला काढलंय? निवडणूक आयोगाचा घोळ, राज ठाकरेंचे गंभीर आरोप

    Maha Vikas Aghadi Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांवेळीच्या मतदार यादीतील नाव आणि वयाच्या घोळांवर बोट ठेवलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांबाबत असलेल्या तक्रारींवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडले. यावेळी राज ठाकरेंनी मतदार यादीतील नाव आणि वयाच्या घोळांवर बोट ठेवलं

    राज ठाकरे काय म्हणाले?

    काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग ाच्या प्रतिनिधींना भेटलो, आज केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. निवडणूक आयोग हे फक्त निवडणूका कंडक्ट करतात, मात्र राजकीय पक्ष निवडणूक लढवतात. मात्र राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतही नसतील, तर इथेच पहिला घोळ आहे.
    Maharashtra TimesShekhar Pachundkar : ज्या नेत्याला अमोल कोल्हेंनी फोडलं, त्याने वर्षभरातच हाती ‘कमळ’ घेतलं, शरद पवारांना मोठा धक्का
    २०२४ च्या आधीची विधानसभा निवडणूक मतदार यादी राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. यामध्ये एकाचं वय ११७, तर दुसऱ्याचं वय १२४ वर्ष असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. “२०२४ च्या यादीतील छोटासा तपशील वाचून दाखवतो. मतदारसंघ क्रमांक १६०, कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम, वडिलांचं नाव दीपक कदम, वय वर्ष २३.. आता दीपक कदम, वडिलांचं नाव रघुनाथ कदम, वय ११७.. मतदारसंघ १६१ चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वय वर्ष १२४, वडिलांचा तपशील महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय ४३.. कोणी कोणाला काढलंय तेच कळत नाही..” असं राज ठाकरे सांगताच हशा पिकला.

    Maharashtra TimesVaibhav Khedekar : भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकरांना डबल गिफ्ट, पक्षश्रेष्ठींचं ‘महा’वचनही, अन् पत्नीलाही मोठी जबाबदारी
    पुढे ते म्हणाले की २०२४ नंतरच्या यादीत ना फोटो आहे ना पत्ता, फक्त नावं आहेत. पाच वर्ष महापालिका निवडणुका झाल्याच नाहीत. मग याद्या सुधारण्यासाठी आणखी सहा महिने गेले तर काय फरक पडतो. याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. यावर ते काय निर्णय घेतात ते पाहू आणि सर्व राजकीय पक्ष एकत्रित निर्णय घेऊ, असं राज ठाकरे म्हणाले. बातम्या लागल्यावर वेबसाईटवरुन याद्या गायब होतात नि निवडणूक आयोगाला खबरच नाही, असंही राज म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा