• Tue. Jun 16th, 2026
    कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गासाठी ३५० झोपड्या भुईसपाट! मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्ग जोडणार; प्रकल्प कधी पूर्ण होणार?

    Central-Trans-Harbour Railway: ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी आणि मध्य – ट्रान्स हार्बर मार्गाला थेट जोडून कल्याण ते नवी मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासासाठी कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा.प्रतिनिधी, मुंबई/ म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई:
    जागेअभावी एक दशकापासून रखडलेल्या कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्याला १० वर्षांनंतर अखेर गती मिळाली आहे. प्रकल्पात अडथळा ठरलेल्या ३५० प्रकल्पबाधितांना ठाण्यात नवे घरे दिल्यानंतर झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. यामुळे उन्नत मार्ग उभारणीसाठी निम्मी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित झोपड्या हटवून संपूर्ण जागा मोकळी केल्यानंतर नवा रेल्वे मार्ग उभारण्यास आरंभ होणार आहे. या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे थेट जोडली जाणार असल्यामुळे कल्याण, कर्जत आणि कसारा येथून थेट वाशी-बेलापूर लोकल सेवा उपलब्ध होणार आहे:

    १० वर्षांपूर्वी प्रकल्पाला मंजुरी

    मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ प्रकल्पात कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचा समावेश आहे. ठाणे स्थानकातील प्रवासी गर्दीचा भार कमी करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प नोव्हेंबर २०१६मध्ये मंजूर झाला. अतिक्रमणांमुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला. पहिल्या टप्प्यात दिघा गाव स्थानक जानेवारी २०२४मध्ये रेल्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या मार्गाचा दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक २.४० हेक्टरपैकी १.८७ हेक्टर सरकारी जागा ‘एमआरव्हीसी’च्या ताब्यात आहे. उर्वरित ०.५३ हेक्टर खासगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    Maharashtra TimesKalwa-Airoli Rail Corridor: कल्याणवरून थेट नवी मुंबईपर्यंत प्रवास शक्य, ‘कळवा ते ऐरोली रेल लाइन’चा मार्ग मोकळा; मध्य रेल्वेकडून काम सुरू

    प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे भोलानगर आणि शिवाजीनगर परिसरातील सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण रखडले होते. राज्य सरकारमधील सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर भोलानगरमधील प्रकल्पबाधितांनी ठाण्यातील बाळकूम परिसरातील नव्या घरांचा ताबा स्वीकारला आहे. ३५० कुटुंबीयांचे पुर्नवसन झाल्याने संबंधित झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक एकूण जागेपैकी निम्मी जागा ताब्यात आली आहे.

    प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार

    शिवाजीनगरमधील उर्वरित ४३६ प्रकल्पग्रस्तांनी मात्र कळव्यातील जागा सोडण्यास नकार दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे येथील रहिवाशांनी प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. प्रकल्पबाधितांसह लोकप्रतिनिधींची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कल्याण-ऐरोली थेट लोकल सुरू करण्यासाठी हा उन्नत प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएकडून बाळकूम येथे एकूण ८६८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापूर्वी ८२ प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन पूर्ण झाले होते.

    Maharashtra TimesKalyan ST Bus: कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू

    या मार्गासाठी आतापर्यंत ९५% भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ ५% भूसंपादनाअभावी आणि अतिक्रमणामुळे हा प्रकल्प तब्बल एक दशक रखडला. उन्नत रेल्वे मार्गासाठी साधारण ४७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे खर्चात नेमकी वाढ सांगणे शक्य नाही. मात्र, खर्चात जवळपास २०० कोटी रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. संपूर्ण जागेचा ताबा मिळाल्यावर पुढील ३६ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

    कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे कॉरिडॉरच्या विलंबाचा मोठा फटका प्रकल्पाच्या खर्चाला बसला असून, प्रकल्पाचा खर्च तब्बल १५० कोटी रुपयांनी वाढला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा