Ratnagiri News : भागोजी बाबांच्या निधनाने परिसरात हळहळ केली जात असून गडप्रेमींकडूनही शोक व्यक्त केला जात आहे
खेड तालुक्यातील वाडीबेलदार (महिपतगड पायथा) येथील ते ज्येष्ठ ग्रामस्थ होते. खेड तालुका परिसरात तसेच सह्याद्रीच्या रांगेतील असलेल्या महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड अशा दुर्गांची रांग गिरीभ्रमण करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक मानली जाते. मात्र या सगळ्यांची खडा न् खडा माहिती भागोजी बाबांना होती. अनेक दुर्गप्रेमी, ट्रेकर्स यांना ते कायम मार्गदर्शन करत असत. मात्र पाच ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भागोजी बाबांच्या निधनाने परिसरात हळहळ केली जात असून गडप्रेमींकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे
महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड अशा किल्ल्यांच्या रांगा गिरीभ्रमणासाठी अवघड मानल्या जातात. पण या कठीण गडरांगेतील डोंगरदऱ्यांमधील पायवाटा, येथे वास्तव्य करणारे जंगलातील प्राणी, अनेक दुर्मिळ वनस्पती या सगळ्यांची खडयानखडा माहिती त्यांना होती.
Sangli Crime : कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह, वर्षभरातच अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं, कारण ठरलं सासूच्या…
महिपतगड हा तब्बल १२० एकरावर असलेल्या जंगल परिसरात वसलेला किल्ला आहे. या किल्ला परिसराची अचूक माहिती भागोजीबाबांना होती. किल्ल्यावर असलेले पुरातन अवशेष, त्याचं महत्त्वही त्यांना माहिती होतं. महिपतगडावरून हातलोट खिंड–मधुमकरंदगड–प्रतापगड हा गड ट्रेक करण्यासाठी येणाऱ्यांना ते नेहमीच मार्गदर्शन करत असत. त्यामुळे भागोजी भंडारे हे अनेक निसर्गप्रेमी गडप्रेमी यांच्यासाठी नेहमीच आदराचे स्थान होते. त्यांच्यासाठी ते नेहमीच आधारस्तंभ होते.
Pune Accident : बाईक झाडावर आदळली, हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले, पुण्यातील नवविवाहित तरुणाचा करुण अंत, पत्नीचा टाहो
अलिकडे वयोमानानुसार त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. भागोजी भंडारे यांच्या पत्नीचे ऐन तारुण्यात, पन्नास वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यानंतरही त्यांनी संसाराचा गाडा उत्तमरित्या सांभाळला होता. इतकंच नाही तर त्यांनी हा गडकिल्ल्यांचा,निसर्ग भ्रमंतीचा वारसा जपला होता. भागोजी भंडारे यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी असे मोठे कुटुंब आहे.
Navi Mumbai International Airport opening : अखेर ठरलं, नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव नाही?
गडकिल्ल्यांची परिसरातील निसर्गाची माहिती असणाऱ्या ज्येष्ठ जाणकार व्यक्ती अलिकडे दुर्मिळ झाल्या आहेत. भागोजी भंडारे हे अशा व्यक्तींपैकी एक मानले जात. भागोजी बाबांनी जपलेला हा वारसा पुढे कार्यरत ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया शासनाच्या गड किल्ला समितीचे ज्येष्ठ सदस्य, दुर्ग अभ्यासक प्रवीण कदम यांनी महाराष्ट्र टाइम्सजवळ व्यक्त केली आहे

