• Mon. Sep 14th, 2026
अमित शाहांनी पूरग्रस्तांसाठी कुठलीही घोषणा केली नाही महाराष्ट्राचे दुर्दैवं; रोहित पवारांनी घेरलं!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार आज जळगाव जिल्ह्यात होते.यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला मदतीचा प्रस्तावच दिला नाही. गुजरातला प्रस्ताव न पाठवता केंद्र सरकारने हजारो कोटी पाठवले होते.मग महाराष्ट्राने काय कुणाचे घोडे मारले आहे असंही रोहित पवार म्हणाले. दहा हजार कोटी महाराष्ट्राला देत आहोत अशी घोषणा भाषणातून अमित शहा…करतील, अशी अपेक्षा होती. पण घोषणा झाली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed