Ratnagiri Crime News : रत्नागिरीमध्ये तिहेरी हत्याकांडातील दुर्वास पाटीलचा बाप दर्शन पाटीलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुर्वास पाटीलने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. त्यात दुर्वास पाटीलला अटक केली होती, आणि त्यात त्याच्या बापाने त्याला मदत केली होती.
जयगड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तिहेरी खून प्रकरणातील संशयित दर्शन शांताराम पाटील (वय 57) याचा उपचारादरम्यान मुंबईमधील जे.जे. रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. त्याची तब्येत बरी नसल्यानं अतिरिक्त सत्र न्यायालयानं 23 सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. दुर्वास पाटील याने मारहाण केल्यानंतर मृत्यू झालेल्या सिताराम वीर याच्या मृत्यूप्रकरणी दर्शन पाटीलवर भारतीय न्याय संहिता कलम 302, 201, 109 सह 34 भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर मुलगा दुर्वास पाटील याला खून करण्यास प्रवृत्त केल्याचा व या सगळ्याची माहिती दडवल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. अटकेनंतर दर्शन पाटीलची प्रकृती खालावली होती. सुरुवातीला त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्याला मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. वैद्यकीय अहवालांनुसार, तो ‘मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोम’ने ग्रस्त असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
पुण्यात काय चाललंय? स्टाईलमध्ये आला, सीसीटीव्हीला पिस्तूल दाखवली, दुसऱ्याकडे कोयता, पोलीस म्हणतात…
दरम्यान, दर्शन पाटीलच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने दर्शन पाटील हा गंभीर आजारी असल्याचं मान्य केलं. त्यानुसार, न्यायालयानं वैयक्तिक 50 हजार रुपयांच्या जामिनावर आणि तितक्याच रकमेच्या हमीवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानंतर त्याला मुंबईत दाखल करण्यात आलं होतं. जे जे रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या तिहेरी हत्याकांडाचा प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी करत आहेत.

